Mumbai: शहरात कलम १४४ लागू करणार असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिससह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचं मुंबईकरांना आवाहन
मुंबईत कलम १४४ लागू करणार असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं पोलिससह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मुंबईकरांना आवाहन केले आहे.
मुंबईत (Mumbai) पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी जमावबंदीचा (Section 144) आदेश लागू करण्यात आला आहे. ही जमावबंदी 3 डिसेंबर ते 17 डिसेंबर रोजी रात्रीपर्यंत लागू असेल, आशयाची अफवा सोशल मिडीयावर (Social Media) पसरवल्या जात आहे. तसेच काही वृत्तवाहिन्यांकडून देखील या प्रकारची बातमी प्रदर्शित करण्यात आली आहे. तरी नागरीकांनी यासारख्या कुठल्ही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांनी केलं आहे. तसेच जमावबंदी किंवा यासारखा कुठल्याही प्रकारचा निर्णय मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) घेण्यात आला नाही असं नांगरे पाटलांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
Mumbai | I appeal to all to not believe in such false rumours (about the implementation of Section 144 in the city) & spread confusion: Vishwas Nangre Patil, Joint Commissioner of Police
— ANI (@ANI) December 3, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2022 06:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

