महानगरपालिकेने मुंबईत फिल्टर न केलेल्या पाण्याच्या पुरवठा होत असल्याची माहिती सोशल मीडियावर वायरल होत आहे. बीएमसीने या अफवांचे खंडन केले आहे. जारी निवेदनात, हे दावे "पूर्णपणे खोटे आणि निराधार" असल्याचं सांगण्यात आले आहे. बीएमसीने स्पष्ट केले की हे मेसेजेस पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत. महानगरपालिकेने मुंबईकरांना आश्वासन दिले की शहराची पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीतपणे कार्यरत आहे आणि स्वच्छ, निर्जंतुकीकरण केलेले आणि पूर्णपणे प्रक्रिया केलेले पाणी सर्व भागात कोणत्याही व्यत्ययाशिवाय पुरवले जात आहे. नक्की वाचा: Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक.
बीएमसीचे जारी निवेदन
💧✅ Brihanmumbai Municipal Corporation ensures a regular supply of clean, disinfected and fully treated water to the citizens of Mumbai.
⚙️ The water supply system is operating normally, with no malfunctions reported.
📱❌ It has come to the notice that misleading messages are…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 19, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)