Maharashtra Political Crisis: 'पाठीत वार करण्याचा भाजपचा इतिहास', शपथविधी नंतर उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि प्रवक्ते आनंद दुबे यांची प्रतिक्रिया
अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवारांसोबत एनसीपीच्या 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि प्रवक्ते आनंद दुबे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला वर्षपूर्वी झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार मध्ये पुन्हा राजकीय भूकंप झाला आहे. राजभवनावर आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची (Deputy CM Of Maharashtra) शपथ घेतली आहे. अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवारांसोबत एनसीपीच्या 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि प्रवक्ते आनंद दुबे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, "जे नेते कालपर्यंत विरोधी पक्षात होते आणि सरकारवर टीका करायचे, तेच नेते आज त्याच सरकारमध्ये सामील झाले आहेत. आज भाजपला अजित पवार हवे होते, म्हणून त्यांनी त्यांना घेतले, पण आपण विसरता कामा नये. पाठीत वार करण्याचा भाजपचा इतिहास आहे.
#MaharashtraPolitics | Uddhav Thackeray faction leader and spokesperson Anand Dubey, says "The leaders who were in the opposition and used to criticise the government until yesterday, have joined the same government today. Today BJP wanted Ajit Pawar, so they took him, but we… pic.twitter.com/TWecjMHnuD
— ANI (@ANI) July 2, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 02, 2023 03:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

