Amravati Violence: तणावाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी शहरभर फिरून लोकांची केली विचारपूस, दिला आधार
त्रिपुरा हिंसाचाराचे लोण महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. राज्यातील जवळजवळ 6 जिल्ह्यांमध्ये हिंसाचार उफाळला आहे.
त्रिपुरा हिंसाचाराचे लोण महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. राज्यातील जवळजवळ 6 जिल्ह्यांमध्ये हिंसाचार उफाळला आहे. यामध्ये काल अमरावती येथील परिस्थिती चिघळली. अमरावतीतील तणावाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ॲड यशोमती ठाकूर आणि सर्वपक्षीय सहकाऱ्यांनी अथक प्रयत्न केले. इतक्या तणावाच्या परिस्थितीतही ताईंनी शहरभर फिरून लोकांची आपुलकीने विचारपूस केली. त्यांना धीर दिला, निडर राहण्याचा सल्ला दिला. खास करून लहान मुले आणि महिलांना आधार दिला. सर्व पक्षीय, सर्व धर्मीय नागरिकांशी चर्चा केल्यानंतर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. एकाही दोषीला मोकळे सोडणार नाही, अमरावतीत यापुढे अशा घटना घडू देणार नाही, असे यशोमती ठाकूर यांनी ठणकावून सांगितले.
हिंदू असो वा मुसलमान.. सर्वांना ताईंचा आधार #AmravatiUnderControl #Amravati pic.twitter.com/u0LVrSwWfy
— Office Of Yashomati Thakur (@AdvYashomati) November 13, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 14, 2021 09:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

