पश्चिम बंगालमधील राणाघाट येथे रेल्वे अपघात झाला आहे. येथे मालगाडी रुळावरून घसरली. या अपघातामुळे या मार्गावरील गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मालगाडी रुळावरून घसरल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन कारवाईत आले. मालगाडी रुळावरून घसरल्याची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. जेणेकरून इतर गाड्यांची वाहतूक पुढे सुरू करता येईल. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही ही दिलासादायक बाब आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)