'भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची विश्वासार्हता एखाद्या व्यक्तीच्या विधानाने नष्ट होऊ शकत नाही'; उच्च न्यायालयाने फेटाळून लावली उपराष्ट्रपती Jagdeep Dhankhar व मंत्री Kiren Rijiju यांच्यावर कारवाईची मागणी करणारी याचिका

हाय कोर्टाने जगदीप धनखर आणि किरेन रिजिजू यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे.

'भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची विश्वासार्हता एखाद्या व्यक्तीच्या विधानाने नष्ट होऊ शकत नाही'; उच्च न्यायालयाने फेटाळून लावली उपराष्ट्रपती Jagdeep Dhankhar व मंत्री Kiren Rijiju यांच्यावर कारवाईची मागणी करणारी याचिका
Bombay High Court | (Photo Credits: ANI)

बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने उपराष्ट्रपती जगदीप धनखर आणि केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्या न्यायव्यवस्थेबद्दलच्या अलीकडच्या वक्तव्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये दोघांनाही पदावरून हटवण्याची मागणी केली होती. याचिकेमध्ये म्हटले होते की, उपराष्ट्रपती जगदीप धनखर आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आपल्या बेजबाबदार विधानांनी सार्वजनिकरित्या सर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा कमी केली आहे. आता ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

याबाबत उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ‘भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची विश्वासार्हता गगनाला भिडली आहे. एखाद्या व्यक्तीच्या विधानाने ती नष्ट होऊ शकत नाही किंवा प्रभावित होऊ शकत नाही.’ अशाप्रकारे हाय कोर्टाने जगदीप धनखर आणि किरेन रिजिजू यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 21, 2023 06:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).