Kerala Floods: केरळमध्ये मुसळधार पाऊस, आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू; मदतकार्य सुरु
आयएमडीने पठाणमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर आणि पलक्कड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे
केरळमध्ये सततच्या चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. राज्यातील पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 8 जण बेपत्ता आहेत. त्यापैकी कोट्टायममध्ये 13 आणि इडुक्कीमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. पठाणमथिट्टाचा डोंगराळ भाग पुरामुळे अधिक प्रभावित झाला आहे. हवामान खात्याने रविवारीही मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. आयएमडीने पठाणमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर आणि पलक्कड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. राज्यभरात 105 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत आणि आणखी शिबिरे सुरू करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
#KeralaRains | Death toll due to heavy rains & landslide in Kerala stands at 21 (Kottayam-13 and Idukki- 8): State's Information & Public Relations Department
(File pic from Koottikkal, Kottayam district earlier today) pic.twitter.com/NKt0J3ZkcC
— ANI (@ANI) October 17, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 17, 2021 04:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

