वायव्य भारतात पुढील 7 दिवस उष्णतेच्या लाटेची अपेक्षा नाही पण कमाल तापमान 40 अंश राहण्याची शक्यता  हवामान खात्याचा अंदाजपत्रात देण्यात आली आहे. मे महिन्याच्या पहिल्या सहामाहीत उष्णतेच्या लाटेची परिस्थिती वायव्य भारताच्या भागांना प्रभावित करणाऱ्या Western Disturbances मुळे कमी होती. आता पुन्हा Western Disturbances ची शक्यता असल्याने  पुढील 7 दिवस तेथे उष्णतेच्या लाटेची अपेक्षा नाही. पण कमाल तापमान असेल, 40°C पर्यंत असल्याचा अंदाज कुलदीप श्रीवास्तव, IMD, दिल्ली यांनी वर्तवली आहे. हरियाणा, दक्षिण हरियाणा, दिल्ली एनसीआर, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर-पूर्व राजस्थानवर धुळीचे वारे वाहत आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे Western disturbances निघून गेल्याने जोरदार वारे वाहत आहेत. Heatwave Advisory By Government: तीव्र उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कामगारांसाठी जारी केली मार्गदर्शक तत्त्वे, वाचा सविस्तर .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)