CM Arvind Kejriwal यांनी घेतली CM Nitish Kumar यांची भेट; म्हणाले- 'सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केंद्रातील सरकार बदलणे आवश्यक'

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बुधवारी संध्याकाळी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली.

CM Arvind Kejriwal यांनी घेतली CM Nitish Kumar यांची भेट; म्हणाले- 'सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केंद्रातील सरकार बदलणे आवश्यक'
CM Arvind Kejriwal, Nitish Kumar

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बुधवारी संध्याकाळी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यापूर्वी नितीश कुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपला सत्तेवरून हद्दपार विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर म्हटले की, ‘सध्या देश कठीण काळातून जात आहे. हे स्वातंत्र्यानंतरचे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे आणि सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सरकार बदलणे आवश्यक आहे. नितीशकुमार यांनी घेतलेल्या पुढाकारासोबत आम्ही आहोत. आपण सर्वांनी एकत्र येऊन केंद्राच्या विरोधात उभे राहिले पाहिजे.’ (हेही वाचा: Bihar CM Nitish Kumar Meet Rahul Gandhi: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतली काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 12, 2023 08:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).