Ramdas Kadam On Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे यांच्यामुळेचं शिवसेना टिकली; रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे वगळता संपूर्ण शिवसेना भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत होती, असा दावा शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे.

Ramdas Kadam On Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे यांच्यामुळेचं शिवसेना टिकली; रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका
Ramdas Kadam, Uddhav Thackeray (PC - ANI)

Ramdas Kadam On Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोर वृत्तीने महाराष्ट्रातील सरकार बदलले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागली. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे वगळता संपूर्ण शिवसेना भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत होती, असा दावा शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श न मानता शिवसेना सुप्रिमो शरद पवार यांच्या आज्ञा पाळत असल्याचा आरोपही त्यांनी यावेली केला.

रामदास कदम पुढे बोलताना म्हणाले की, अजित पवार सकाळी 7 वाजता मंत्रालयात बसायचे. शरद पवार सकाळी सहा वाजल्यापासूनच कामाला लागायचे. मंत्रालयात बसून त्यांनी राष्ट्रवादीच्या अनेक माजी आमदारांना कोट्यवधींचा निधी दिला. त्यांना राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करायचा होता. शिवसेनेचे सर्व आमदार भाजपमध्ये जात होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्यामुळेचं बाळासाहेबांची शिवसेना टिकली असल्याचा दावाही कदम यांनी केला. (हेही वाचा - Maharashtra Politics: शिंदे फडणवीस सरकार लवकरच विधान परिषदेवरील नियुक्त 12 आमदारांची नवी यादी राज्यपालांना पाठवणार)

उद्धव ठाकरे मराठ्यांचा द्वेष करतात, असा आरोप रामदास कदम यांनी केला. मराठा माणूस पुढे सरकलेला त्यांना आवडत नाही. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जिथे सभा घेतील तिथे रामदास कदम यांचीही सभा होईल, असेही ते म्हणाले. खरा देशद्रोही कोण? खरा फसवणूक करणारा कोण? मी जनतेला सत्य सांगेन. मी प्रत्येक जिल्ह्यात जाईन. मला 3 वर्षे बोलू दिलं नाही. ते स्वतःला मालक आणि इतरांना नोकर समजतात. बाळासाहेब सर्व नेत्यांशी बोलायचे. चर्चा करून निर्णय घ्यायचे, असंही रामदास कदम यावेळी म्हणाले.

दरम्यान, रामदास कदम म्हणाले, मातोश्रीवरून शिवसेनेच्या एका नेत्याला गुहागर येथे माझा पराभव करण्याचे आदेश देण्यात आले होते. वेळ आल्यावर नाव सांगेल. भूकंप होईल. मी गाफील होतो. मला गेल्या 2 दिवसात कळले. माझा पराभव झाला. मात्र शिवसेनाप्रमुखांनी मला विधानपरिषदेची संधी दिली. त्यांच्या भाषणापेक्षा माझ्या भाषणाला टाळ्या मिळतात, असा दावाही कदम यांनी केला.

आज एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांवर चालत आहेत. तर उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या विचारांवर चालत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा अनादर करून पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले आहे. आज एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या विचारांवर प्रत्यक्ष काम करत आहेत, असा विश्वासही यावेळी रामदास कदम यांनी व्यक्त केला.

(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2022 02:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).