शिवसेना पक्षाचं महाराष्ट्रभर वाढत्या इंधनदर वाढी विरोधात आंदोलन
मुंबईतील दादर, गिरगाव, भायखळा , वडाळा, वांद्रे भागात शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. यावेळेस त्यांनी केंद्र सरकार विरोधात नारेबाजी देखील केलेली पहायला मिळाली. जालना मध्ये अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्त्वाखाली दुचाकींची अंत्ययात्रा काढण्यात आली होती.
महाराष्ट्रात आज भाजपाने वीजबिलांविरोधात 'ताला ठोके' आंदोलन करत असतानाच शिवसेना देखील वाढत्या इंधनदरा वरून आक्रमक झालेली पहायला मिळाली आहे. दिवसागणिक वाढणारे इंधनदर पाहता अनेक ठिकाणी राज्यात शिवसेनेकडून आंदोलन हाती घेण्यात आले आहे. आज महाराष्ट्रात मुंबई मध्ये आंदोलना दरम्यान महापौर किशोरी पेडणेकर देखील रस्त्यावर उतरलेल्या दिसल्या आहे. राज्यात काही ठिकाणी बैलगाडी हाकत तर काही ठिकाणी दुचाकीची अंत्ययात्रा काढून शिवसेनेने वाढत्या इंधनवाढी विरोधात निषेध केला आहे.
मुंबईतील दादर, गिरगाव, भायखळा , वडाळा, वांद्रे भागात शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. यावेळेस त्यांनी केंद्र सरकार विरोधात नारेबाजी देखील केलेली पहायला मिळाली. जालना मध्ये अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्त्वाखाली दुचाकींची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. इंधन दरवाढ मागे घ्यावी अशी त्यांची मागणी आहे. शहापूर मध्येही शिवसैनिकांनी तहसीलदार कार्यालयापर्यंत बैलगाड्या हाकत मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी त्यांनी तहसीलदार्याला निवेदन दिले आहे. महाराष्ट्रात नांदेड, भिवंडी, परभणी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, पंढरपूर मध्येही अशाच प्रकारे शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले पहायला मिळाले.
जालना मधील आंदोलन
शिवसेनापक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून इंधन दरवाढ विरोधात शिवसेना जालनातर्फे अर्जून खोतकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @CMOMaharashtra pic.twitter.com/7itYRfyIrx
— Arjun Khotkar (@miarjunkhotkar) February 5, 2021
मुंबईच्या बोरीवली भागात आंंदोलन
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री @CMOMaharashtra यांच्या आदेशानुसार "केंद्र सरकारने लादलेल्या पेट्रोल-डिझेल-गॅस इंधन दरवाढी विरोधात" बोरिवली येथे ओंकारेश्वर मंदिर ते बोरिवली स्थानकापर्यंत बैलगाडी-सायकल मार्च आणि प्रचंड जनसमुदायासह महामोर्चा काढण्यात आला. pic.twitter.com/KRoOz7etcw
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) February 5, 2021
वाढत्या इंधनाच्या दरामुळे महागाई देखील वाढण्याची भीती बळावली आहे. आज शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना वर्षाला एसटी बस चालवायला 3 हजार कोटींचं डीझेल आवश्यक असतं, अशा इंधन दरवाढीमुळे भविष्यात हे ओझं राज्य सरकार आणि जनतेच्या खांद्यावर येणात आहे अशी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे सराकारने इंधनाचे दर नियंत्रित करावेत म्हणून मागणी जोर धरत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Feb 05, 2021 03:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

