Santosh Deshmukh Murder Case: 'या प्रकरणाशी माझा संबंध नाही, मी राजीनामा का द्यावा?'; Minister Dhananjay Munde यांचा सवाल
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मिक कराडची धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याशी जवळीक असल्याचंही समोर आले आहे. त्यानंतर आता धनंजय मुंडेंवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रातील बीड (Beed) जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेला 23 दिवस उलटूनही या प्रकरणातील काही आरोपी अद्याप फरार असून, ज्यांना पोलीस अद्याप पकडू शकलेले नाहीत. आता या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी टीम तयार करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात वातावरण तापले असून, पक्ष आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मिक कराडची धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याशी जवळीक असल्याचेही समोर आले आहे. त्यानंतर आता धनंजय मुंडेंवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. विरोधकांकडून आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असून धनंजय मुंडे यांना अडचणीत आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.
विरोधकांच्या राजीनामाच्या मागण्या आणि आरोपांना प्रत्युत्तर देताना मुंडे यांनी गुरुवारी या प्रकरणातील आपला सहभाग ठामपणे नाकारला आणि आपण या प्रकरणात सहभागी नसताना राजीनामा का द्यायचा असा सवाल केला. ते म्हणाले, मी राजीनामा देण्याचे कारण काय आहे?. मी यापैकी कोणत्याही प्रकरणात आरोपी नाही किंवा माझा त्याच्याशी काही संबंध नाही. मग माझा राजीनामा का मागितला जात आहे. मुंडे मंत्रिपदावर राहिले तर हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दबाव येऊ शकतो, त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, असा आरोप विरोधकांनी केला आहे. (हेही वाचा: Santosh Deshmukh Murder Case: मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवार यांचा दावा)
याला उत्तर देताना मुंडे म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. मी मंत्रिमंडळात असलो तरी तपासावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही केली जाईल. याशिवाय मी त्या जिल्ह्यातील मंत्री आहे, त्यामुळे मी जिल्ह्याचा पालकमंत्री राहणे योग्य ठरेल. देशमुख यांच्या हत्येनंतर पोलिसांनी सरपंचाचे नातेवाईक शिवराज देशमुख यांच्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यासह या प्रकरणातील तीन फरार आरोपींना पकडण्यासाठी बीड पोलिसांनी गुरुवारी तिघांची छायाचित्रे व तपशील प्रसिद्ध केला आणि त्यांना या खून प्रकरणात वाँटेड घोषित केले. नागरिकांनी त्यांची माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2025 11:11 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

