Nagpur Violence: 'छावा चित्रपटामुळे औरंगजेबाविरुद्ध लोकांचा रोष भडकला'; नागपूर हिंसाचारावर CM Devendra Fadnavis यांचे भाष्य (Video)
विधानसभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, धार्मिक वस्तूंची विटंबना झाल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या त्यामुळे हा हिंसाचार उफाळला. हा एक सुनियोजित हल्ला असल्याचे दिसून येते. त्यांनी सांगितले की, सुमारे 80 जणांचा जमाव दगडफेकीत सहभागी होता आणि त्यांनी जाणूनबुजून पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य केले होते.
काल नागपूर (Nagpur) येथे हिंसक दंगल (Violence) उसळली. औरंगजेबाच्या कबरीवरून झालेल्या वादानंतर शहरातील महाल आणि हंसपुरी येथे दोन गटांमध्ये हिंसाचार झाला. हिंसाचारात अनेक लोकांची घरे, दुकाने आणि अगदी वाहनेही जाळण्यात आली. आता यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान समोर आले आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या हिंसक घटना आणि दंगली पूर्वनियोजित असल्याचे दिसून येते. मुख्यमंत्र्यांनी असेही म्हटले की, छावा चित्रपटामुळे औरंगजेबाविरुद्ध लोकांचा रोष वाढला आहे, तरीही महाराष्ट्रात सर्वांनी शांतता राखली पाहिजे.
फडणवीस पुढे म्हणाले की, पोलिसांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल. त्यांनी सांगितले की, या हिंसाचारात अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हिंसाचाराचा व्हिडिओ समोर आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) आणि बजरंग दलाच्या निदर्शनादरम्यान हिंसाचार उसळताना दिसत आहे. हल्लेखोरांनी निवासी भागात घुसून वाहनांचे नुकसान केले आणि दगडफेक केली.
Nagpur Violence:
On Nagpur violence, Maharashtra CM Devendra Fadnavis says, "This violent incident and riots seem to be pre-planned."
"Chhava movie has ignited people’s anger against Aurangzeb still, everyone must keep Maharashtra peaceful." pic.twitter.com/XYaDSuBP7X
— ANI (@ANI) March 18, 2025
My statement in Maharashtra Legislative Assembly on yesterday's #Nagpur incident.
दि. 17 मार्च 2025 रोजी नागपूर येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने विधानसभेत निवेदन...
(विधानसभा, मुंबई | दि. 18 मार्च 2025) #Maharashtra #MahaBudgetSession2025 pic.twitter.com/MMXlfDiGxp
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 18, 2025
विधानसभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, धार्मिक वस्तूंची विटंबना झाल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या त्यामुळे हा हिंसाचार उफाळला. हा एक सुनियोजित हल्ला असल्याचे दिसून येते. त्यांनी सांगितले की, सुमारे 80 जणांचा जमाव दगडफेकीत सहभागी होता आणि त्यांनी जाणूनबुजून पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य केले होते. एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आणि तीन उपायुक्तांवर हल्ला करण्यात आला. काही घरांना विशेषतः लक्ष्य करण्यात आले होते आणि एक डीसीपी गंभीर जखमी झाले. (हेही वाचा: Nagpur Violence: औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात हिंसक दंगल; जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनांमुळे वातावरण तापले, CM Devendra Fadnavis यांचे शांततेचे आवाहन)
तणाव वाढविण्यात खोट्या अफवांनी कशी मोठी भूमिका बजावली यावर फडणवीस यांनी भर दिला. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी, अधिकाऱ्यांनी 11 पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात पाच गुन्हेगारी गुन्हे दाखल केले आहेत आणि प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. याव्यतिरिक्त, राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या विषयावर भाष्य केले आणि म्हटले की, ही हिंसाचार जातीय तणाव निर्माण करण्याचे षडयंत्र असल्याचे दिसून येते. खरे देशभक्त मुस्लिम कधीही औरंगजेबाचे समर्थन करणार नाहीत.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

