Mumbai Crime: 7,000 रुपये कर्ज न दिल्याने महिलेचे अपहरण, कुर्ल्यातून दोघांना अटक
पतीने कर्जाची रक्कम परत न केल्याने एका ३२ वर्षीय महिलेचे अपहरण करून चार जणांनी तिच्यावर प्राणघातक हल्ला केला.
Mumbai Crime: पतीने कर्जाची रक्कम परत न केल्याने एका 32 वर्षीय महिलेचे अपहरण करून चार जणांनी तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणात पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. 19 ऑक्टोबर रोजी चेंबूरच्या चेड्डा नगर येथे दोन महिलांसह चार जण तिच्या घरात घुसले आणि पैशाची मागणी करू लागले. तीने पैसे नसल्याचे सांगितल्यावर तीला भरपूर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पीडितेला चौघांनी जबरदस्तीने ऑटोरिक्षात ढखलले आणि कुर्ल्यातील बंतारा भवन येथे नेले,
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबा आणि आफरीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन महिला आरोपींनी पीडितेला खुर्चीला बांधले, त्यानंतर तिसरा आरोपी इम्रान याने तिच्या चेहऱ्यावर धातूची बांगडी (कडा) वापरून पीडितेला मारामारी केली. ठोसे मारल्यामुळे पीडितेच्या ओठावर जखम झाल्याचे पोलिसांनी सांगितले. चौथा आरोपी अरबाज याने पीडितेचा बुरखा फाडला. पीडितेने पोलिसांना सांगितले की, साबा आणि आफरीन या दोघींनी तिच्या पतीने त्यांच्याकडून 7,000 रुपये उसने घेतले होते म्हणून तिला अपशब्द वापरले. परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ते वेळेवर परत करू शकले नाहीत.
पत्नीच्या अपहरणाची पोलिसांत देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणांतून दोन महिलांना अटक करण्यात आले आहे. दोन आरोपी फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांचा शोधमोहिम पोलिसांनी सुरु केला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 23, 2023 07:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

