
भारतीय हवामान विभागाने (IMD) मॉन्सून 2025 साठी महाराष्ट्रातील जिल्हानिहाय हवामान अंदाज जाहीर (IMD Weather Forecast) केला आहे. या अहवालानुसार पुढील काही दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी, वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता (Maharashtra Rain Alert) वर्तवण्यात आली आहे. 26 मे 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या बुलेटिनमध्ये विशेषतः कोकण (Konkan Rainfall) व घाटमाथ्याच्या भागांमध्ये उच्च सतर्कता जारी करण्यात आली आहे.
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्ट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांत अतिवृष्टी, जोरदार वारे (60 किमी/तास पर्यंत) आणि वीज पडण्याचा धोका आहे. या भागांमध्ये पाणी साचणे, पूरस्थिती, वाहतुकीची अडचण आणि स्थानिक सेवांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Mumbai Rains Red Alert: मुंबईत संततधार सुरुच! आयएमडीकडून 27 मे पर्यंत रेड अलर्ट; कसे असेल उद्याचे हवामान?)
रायगड, सातारा, रत्नागिरी, तसेच पुणे आणि कोल्हापूर घाटमाथा या भागांमध्येही सततच्या पावसामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर तसेच शेतीवर परिणाम होऊ शकतो.
मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता
कोकण व घाटमाथ्याच्या तुलनेत मराठवाडा आणि विदर्भ विभागातील नांदेड, लातूर, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
धुळे, जळगाव, नंदुरबार, तसेच नाशिक, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांत चकमक वादळांसह मध्यम पावसाची शक्यता आहे, विशेषतः घाटमाथ्याच्या भागात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Torrential Rains In Baramati: नीरा डावा कालवा फुटला; बारामती, इंदापूर परिसरात मुसळधार पाऊस, पूरसदृश्य स्थिती)
महाराष्ट्रात मान्सून दाखल
मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाला असून हवामान खात्यानं मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट आहे. पालघरसाठी यलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली,…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 26, 2025
कृषी हवामान सल्ला: शेतकऱ्यांनी तत्काळ खबरदारी घ्यावी
हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी कृषी हवामान सल्ला जाहीर केला आहे, ज्यामध्ये पुढील सूचना देण्यात आल्या आहेत:
-
- काढणीस तयार पीक तात्काळ काढून सुरक्षित ठिकाणी हालवा.
- फळझाडे आणि भाजीपाला यांना आधार द्या, गळती टाळा.
- काढलेले पीक झाकून ठेवा आणि धान्य साठवणूक सुरक्षित ठिकाणी करा.
- वादळाच्या इशाऱ्यादरम्यान सिंचन व रासायनिक फवारणी टाळा.
- शेतीच्या शिवारात निचऱ्याची व्यवस्था करा व जनावरांना सुरक्षित आसरा द्या.
- अतिवृष्टीच्या भागातील शेतकऱ्यांनी या सूचनांचे पालन करून पिकांचे नुकसान टाळावे.
जिल्हानिहाय पाऊस
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5… भेट घ्या. pic.twitter.com/8ySBTdy5CM
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 26, 2025
शहरी भागात पूरसदृश परिस्थिती आणि दरड कोसळण्याचा धोका
IMD च्या इशाऱ्यानुसार, काही भागांमध्ये फ्लॅश फ्लड, स्थानिक पूर, दरड कोसळणे, तसेच वीज, पाणी आणि वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पुढील काळजी घ्यावी:
-
-
- पाण्याने भरलेल्या भागांमध्ये जाणे टाळा.
- विजेच्या गडगडाटात इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवा.
- मोठ्या झाडांपासून आणि लोखंडी वस्तूंपासून दूर राहा.
- आपत्कालीन क्रमांक जवळ ठेवा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचना पाळा.
-
हवामान खात्याचे आवाहन – फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा
हवामान विभागाने नागरिकांना फक्त अधिकृत स्रोतांमधूनच माहिती घेण्याचे आवाहन केले आहे. अंदाज हे थेट डेटा आणि मॉडेल गाइडन्सवर आधारित आहेत. परिस्थितीच्या अनुषंगाने पुढील अपडेट्स वेळोवेळी जारी करण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी भेट द्या:
-
-
- https://mausam.imd.gov.in
- https://mausam.imd.gov.in/mumbai
- http://www.imdnagpur.gov.in
-
कोकण किनारपट्टीवर मोठ्या लाटा आणि वादळी वाऱ्यांमुळे समुद्र खवळलेला राहणार आहे. मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा यांसारख्या डोंगराळ पर्यटन स्थळांवर दरड कोसळण्याचा धोका असल्यामुळे पर्यटकांनी खबरदारी घ्यावी.