मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील एकूण पाणीसाठा ८८.८८ टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाच्या ओढीमुळे जलाशयांच्या साठ्यात मोठी वाढ होण्याऐवजी तो जवळपास स्थिर पातळीवर राहिला आहे. गेल्या आठवडाभरात मुंबईच्या पाणीसाठ्यात मोठी झेप न दिसता संथ पण स्थिर हालचाल नोंदवली गेली आहे. सोमवारी हा साठा ९०.०६ टक्के इतका होता, मंगळवारी तो किंचित घसरून ८९.५४ टक्क्यांवर आला, तर बुधवारी ८८.९३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणातील साठा ८६ ते ८७ टक्क्यांच्या दरम्यान नोंदवला जात आहे, तर अप्पर वैतरणा जलाशयात साठा तुलनेने कमी म्हणजे सुमारे ७९ टक्के इतका आहे.
मुंबईतील तलावांमधील आजची पाणी पातळी
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल #MyBMCUpdates pic.twitter.com/FnrvzJ3TY7
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 10, 2026
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)