मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा सध्या समाधानकारक पातळीवर असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) हायड्रॉलिक इंजिनिअरिंग विभागाने जाहीर केलेल्या ताज्या अहवालातून समोर आले आहे. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजताच्या आकडेवारीनुसार, या तलावांमधील एकूण उपयुक्त जलसाठा १३ लाख ६ हजार ३६४ दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचला असून, हे प्रमाण एकूण क्षमतेच्या ९०.२६ टक्के इतके आहे.

सध्या  मोडक सागर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून येथे १०० टक्के साठा नोंदवण्यात आला आहे. विहार तलावातही १०० टक्के साठा असल्याचे अहवालात नमूद आहे, तानसा तलावात ९९.१८ टक्के, तर तुळशी तलावात १०० टक्के उपयुक्त साठा आहे. मध्य वैतरणा तलावात ९३.७२ टक्के साठा नोंदवला गेला. तर अप्पर वैतरणा तलावात ८१.४५ टक्के, तर भातसा धरणात ८८.०७ टक्के साठा आहे.

 

कोणत्या तलावात किती साठा?

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)