Gokhale Bridge Andheri: अंधेरी येथील गोखले पूल 2 वर्षांसाठी बंद, मुंबई महापालिकेचा निर्णय; जाणून घ्या कारण

बीएमसीने मुंबईतील (Mumbai) अंधेरी परिसरातील गोखले पूल (Andheri Gokhale Bridge) किमान दोन वर्षांसाठी सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा पूल, ज्याचा एक भाग 2018 मध्ये कोसळला होता, त्यात दोघांचा मृत्यू झाला होता, हा अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा प्रमुख मार्ग आहे आणि तो उपनगरातील सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक आहे.

Gokhale Bridge Andheri: अंधेरी येथील गोखले पूल 2 वर्षांसाठी बंद, मुंबई महापालिकेचा निर्णय; जाणून घ्या कारण
Gokhale Bridge Andheri | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

बीएमसीने मुंबईतील (Mumbai) अंधेरी परिसरातील गोखले पूल (Gokhale Bridge Andheri) किमान दोन वर्षांसाठी सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा पूल, ज्याचा एक भाग 2018 मध्ये कोसळला होता, त्यात दोघांचा मृत्यू झाला होता, हा अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा प्रमुख मार्ग आहे आणि तो उपनगरातील सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक आहे. प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग काढण्यासाठी बीएमसीने (BMC) वाहतूक पोलिसांना पत्रही लिहिले आहे.

मुंबईतील अंधेरी परिसरात असलेला गोखले पूल सर्व वाहनांसाठी पुढचे किमान दोन वर्षे बंद असणार आहे. हा पूल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय बीएमसीने घेतला आहे. हा पूल 2018 मध्ये कोसळला होता. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अनेक कारणांनी हा पूल चर्चेत आला होता. परिणामी सुरक्षेच्या कारणास्थव हा पूल पुढचे दोन वर्षे बंद ठेवण्यात येईल. दरम्यानच्या काळात हा पुल नव्याने उभारला जाणार की त्याची देखभाल, दुरुस्ती करुन पुन्हा कार्यरत केला जाणार याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Electric Vehicles Costing: इलेक्ट्रिक वाहन विकत घेणाऱ्यांसाठी खुशखबर; किंमतीबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा)

गोखले पूल हा अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिमेला जोडणारा प्रमुख मार्ग आहे आणि तो उपनगरातील सर्वात व्यग्र मार्गांपैकी एक आहे. प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग काढण्यासाठी बीएमसीने वाहतूक पोलिसांना पत्रही लिहिले आहे. BMC ने दर सहा महिन्यांनी पुलांची तपासणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या कन्सल्टन्सी फर्मने हा पूल 'धोकादायक आणि असुरक्षित' असल्याचे म्हटले आणि तो सर्व वाहतुकीसाठी बंद करावा असे सुचवले आहे. दरम्यान, संपूर्ण पुलाच्या पुनर्बांधणीसाठी किमान दोन वर्षे लागतील. तोपर्यंत तो सर्व वाहतूक वाहतुकीच्या मर्यादेबाहेर राहील," असे पूल विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

गोखले पुलाचा काही भाग जुलै 2018 मध्ये कोसळल्यानंतर, BMC ने IIT-Bombay द्वारे मुंबईतील सर्व पुलांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. गोखले पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी अर्धवट खुला ठेवण्यात आला होता, त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.

पश्चिम उपनगरात दर 6 महिन्यांनी पुलांचे ऑडिट करण्यासाठी नियुक्त केलेल्या SCG कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने सादर केलेल्या अहवालानुसार, सध्या कार्यरत असलेल्या गोखले पुलाच्या भागाला स्ट्रक्चरल क्रॅक आहेत आणि आतील स्टील देखील गंजले आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या तपासणीनंतर एससीजी कन्सल्टन्सीने गोखले पूल बंद करण्याची शिफारस केली होती. हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 03, 2022 11:03 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).