Weather Alert: कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल परिस्थिती; 'या' जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटची शक्यता

मुंबई आणि कोकणच्या काही भागात मान्सूनसारखे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांत मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर सारख्या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Weather Alert: कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल परिस्थिती; 'या' जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटची शक्यता
Rain (फोटो सौजन्य - फेसबुक)

Weather Alert: राज्यात सध्या हवामानाच्या विपरीत परिस्थिती पाहायला मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि वादळ येत आहे. तसेच काही जिल्ह्यांमधील लोकांना सतत उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. तथापी, मुंबई आणि कोकणच्या काही भागात मान्सूनसारखे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांत मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर सारख्या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

जळगावातील अनेक भागात गारपीट -

दरम्यान, रविवारी, जळगाव, पिंपरी-चिंचवड आणि नांदेड सारख्या शहरांमध्ये सुमारे 30 मिनिटे जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला. जळगावातील अनेक भागात गारपीटही झाली. भारतीय हवामान विभागाच्या मते, पश्चिम राजस्थानपासून उत्तर विदर्भापर्यंत पसरलेल्या कमी दाबाच्या प्रणालीमुळे अचानक पाऊस पडला आहे, ज्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. (हेही वाचा -Mumbai Lake Water Level: मुंबईकरांना करावा लागू शकतो पाणीटंचाईचा सामना; सध्या धरणांमध्ये केवळ 31 टक्के पाणीसाठी शिल्लक)

हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज -

भारतीय हवामान विभागाने नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना आणि बीड यासह अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा जारी केला आहे. सोमवारपासून लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग ताशी 30-40 किमीपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. दिवसाचे तापमान आणि बाष्पीभवन वाढल्याने वातावरणातील आर्द्रतेत वाढ झाल्याने काही भागात तुरळक पाऊस आणि गारपीट होत आहे. (हेही वाचा: Mumbai Wate Lake Evaporation: मुंबईच्या घशाला कोरड? उन्हाचा ताप, बाष्पीभवन वाढले; पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील जलसाठा घटला)

विदर्भात उष्णतेची लाट -

काही भागात पावसामुळे तात्पुरता आराम मिळत असला तरी, विदर्भासारख्या प्रदेशात उष्णतेची लाट कायम आहे. राज्याच्या बहुतेक भागात दिवसाचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या जवळपास राहते. तथापि, गेल्या काही दिवसांपासून किनारपट्टीवर तापमानात हळूहळू घट दिसून आली आहे, ज्यामुळे हवामानाच्या ट्रेंडमध्ये थोडा बदल दिसून येत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2025 02:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).