Sanjay Raut Tweet: खोट्या गर्वाचे पक्षी जास्त फडफडतात... गरुडाच्या उड्डाणाचा कधीच आवाज येत नाही, संजय राऊतांचे ट्विट चर्चेत
या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. त्यांनी भाजपला खोट्या अभिमानाचा पक्ष आणि शिवसेनेला उंच उडणारा पक्ष असे वर्णन केले आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान एका ट्विटची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेने महाराष्ट्रातून संजय राऊत (Sanjay Raut) आणि संजय पवार (Sanjay Pawar) यांना उमेदवारी दिली आहे. या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. त्यांनी भाजपला खोट्या अभिमानाचा पक्ष आणि शिवसेनेला उंच उडणारा पक्ष असे वर्णन केले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 6 जागांसाठी आज निर्णय होणार आहे. यासाठी एकूण 40 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह तीन उमेदवार उभे केले आहेत. महाविकास आघाडी या तीन पक्षांनी (राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना) मिळून चार उमेदवार उभे केले आहेत.
संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या चारही उमेदवारांचा विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये शेर लिहिला आहे. या शेरात भाजपचे नाव न घेता त्यावर उपरोधिक टोला लगावला आहे. हा शेर असा आहे 'फक्त खोट्या गर्वाचे पक्षी जास्त फडफडतात. गरुडाच्या उड्डाणात कधीच आवाज येत नाही. यानंतर संजय राऊत यांनी ‘जय महाराष्ट्र’ लिहून आपला संदेश संपवला आहे.
झुठी शान के परिंदे ही
ज्यादा फडफडाते हैं...!
बाझ की उडान मे
कभी आवाज नही होती..!!
जय महाराष्ट्र..!!! pic.twitter.com/BpWAngwY2U
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 10, 2022
या ट्विटशिवाय संजय राऊत यांनी तुरुंगात बंद राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करू न देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संजय राऊत म्हणाले, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना विधानसभेत येऊन मतदान करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. ते अद्याप दोषी सिद्ध झालेले नाहीत. प्रकरण चालू आहे. तरीही त्यांना रोखण्यात आले असेल, तर केंद्रीय तपास यंत्रणा कोणत्या दबावाखाली काम करत आहेत, हे स्पष्ट होते. हेही वाचा Rajya Sabha Elections 2022: नवाब मलिक यांना दिलासा नाहीच, नव्या याचिकेवर सुनावणीस न्यायालयाचा नकार; मविआच्या गोटात हळहळ
संजय राऊत यांचे हे वक्तव्य एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केले आहे. संजय राऊत यांनी हे ट्विट रिट्विट केले आहे. संजय राऊत यांनी आज दिलेल्या निवेदनात हे वृत्तही निराधार असल्याचे म्हटले आहे की, राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांच्या विजयासाठी आवश्यक असलेली मते 42 वरून 44 पर्यंत वाढल्याने शिवसेनेला मिळालेली मते कमी झाल्याने मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे शरद पवारांवर नाराज आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2022 03:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

