Maharashtra Political Crisis: देवेंद्र फडणवीस पुन्हा होवु शकतात मुख्यमंत्री, पण कसे? एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरचे आकडे काय सांगतात, घ्या जाणून
Photo Credit - Twitter

महाराष्ट्राच्या राजकीय वावटळीत शिवसेनेचे (Shivsena) दिग्गज नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे दोन प्रस्ताव पाठवले आहेत. शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि रवींद्र फाटक यांनी पाठवलेल्या दूतांसोबत सुरत येथील ली मेरिडियन हॉटेलमध्ये सुमारे 40 मिनिटे बैठक आणि चर्चेनंतर शिंदे यांनी हे दोन नवे प्रस्ताव पाठवले आहेत. त्यात पहिली अट शिवसेनेने महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा दुसरा प्रस्ताव आहे. तत्पूर्वी मंगळवारी दुपारी एकनाथ शिंदे यांनी त्यांचे निकटवर्तीय आमदार संजय राठोड यांना तीन प्रस्तावांसह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पाठवले होते. या नव्या प्रस्तावात तिसरी अट काढून टाकण्यात आली आहे. शिंदे यांनी संजय राठोड यांना पाठवलेल्या पहिल्या दोन अटी सारख्याच आहेत. म्हणजेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस भाजपचे सरकार येण्याची शक्यता आहे.

आता शिवसेनेने हा प्रस्ताव मान्य केला तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार नाहीत. शिवसेनेने हा प्रस्ताव मान्य केला नाही तर ठाकरे सरकार अल्पमतात येईल. अशा स्थितीत पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन होण्यासाठी आकडेवारीचा खेळ काय म्हणतो, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. एकनाथ शिंदे यांचे समर्थक 13 आमदार असल्याची बातमी आधी आली. त्यानंतर दुपारपर्यंत गुजरात भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दावा केला की, एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ 35 आमदार आहेत. त्यानंतर 22 आमदारांची यादी आली आता एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ 26 आमदार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशा स्थितीत महाविकास आघाडीचे सरकार पडल्यास भाजपकडे बहुमत आहे का?

भाजप 145 चा जादुई आकडा कसा गोळा करेल?

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी 145 चा जादुई आकडा आवश्यक आहे. मात्र भाजपकडे केवळ 106 आमदार आहेत. अपक्ष समर्थक आमदारांचा समावेश केल्यास हा आकडा 113 वर पोहोचतो. आता यात एकनाथ शिंदे यांच्या 26 समर्थकांचा समावेश झाल्यास हा आकडा 139 वर पोहोचतो. राज ठाकरेंच्या मनसेच्या एका आमदाराच्या मदतीने हा आकडा 140 वर पोहोचला आहे. तरीही भाजपला ५ आमदारांची गरज लागणार आहे.

आणखी एका हिशोबानुसार, राज्यसभा निवडणुकीत भाजपला 123 आमदारांचा पाठिंबा मिळाला. विधान परिषदेत हा आकडा 134 वर पोहोचला. अशा स्थितीत भाजपला आणखी 11 आमदारांची गरज भासणार आहे. (हे देखील वाचा: Maharashtra Political Crisis: पुढची रणनीती ठरवण्यासाठी वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक; अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण उपस्थित)

भाजपचे गणित असे बसू शकते

भाजप आमदार 106 + एकनाथ शिंदे समर्थक आमदार 26 + अपक्ष 13 + मनसे 1 = 146

एकनाथ शिंदे आज अमित शहा आणि जेपी नड्डा यांची घेवु शकतात भेट

दरम्यान, सूत्रांच्या हवाल्याने असे वृत्त आहे की, एकनाथ शिंदे त्यांच्या काही समर्थक आमदारांसह अमित शहा आणि जेपी नड्डा यांची अहमदाबाद किंवा गांधीनगरमध्ये भेट घेऊ शकतात. देवेंद्र फडणवीस मंगळवारी सकाळीच दिल्लीला रवाना झाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फडणवीसही दिल्लीहून गुजरातला रवाना होणार आहेत.