सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंड करून 35 आमदारांसह सुरतमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. अहवालानुसार शिंदे यांनी शिवसेनेसमोर भाजपमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यावरून महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची स्थती निर्माण झाली आहे. अशात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी वर्षा बंगल्यावर एक मोठी बैठक पार पडत आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण असे महत्वाचे नेते उपस्थित आहेत. पुढची रणनीती ठरवण्यासाठी तीनही पक्षांचे नेते एकत्र आले आहेत. साधारण रात्री 8 वाजता शरद पवारदेखील यामध्ये सामील होणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)