CM Eknath Shinde On Viral Video From PC: मराठा आरक्षण प्रश्नी पत्रकार परिषदे दरम्यानच्या वायरल व्हिडिओ मागील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला 'हा' खुलासा
आज मनोज जरांगे पाटील यांचं मागील 17 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा रस देऊन त्यांनी मागे घेण्यास भाग पाडलं आहे. आता सरकारला जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी 30 दिवसांचा अवधी दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा पत्रकार परिषदेदरम्यानचा एक व्हिडिओ काल दिवसभर सोशल मीडीयामध्ये वायरल होत होता. या व्हीडिओ वरून विरोधकांनीही सरकार वर हल्लाबोल केला होता. आज मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यावर खुलासा दिला आहे. दरम्यान वाक्याचा शेंडा आणि बोडका काढून मधलंच वाक्य वायरल झाल्याचं यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.
"बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं!" इतकीच क्लिप वायरल झाल्याने अनेकांमध्ये त्याबाबत समज-गैरसमज झाले. पण मुख्यमंत्र्यांनी आज बोलताना 'आम्ही रात्री दीड वाजेपर्यंत बैठका घेत होतो. त्यामुळे प्रश्न-उत्तरं न घेणं, राजकीय भाष्य किंवा इतर गोष्टी न घेता केवळ आरक्षणाबाबत काय झालं ते बोलून निघणं' असा आमचा उद्देश होता. परंतू ते चूकीच्या मेसेज सह वायरल केले झालं आहे.
मीडीयाशी बोलताना त्यांनी तुमच्यावर आमचा विश्वास असतो पण हा घात असं मिश्किलपणे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. परंतू आंदोलन स्थळी मराठा समाजाला संबोधताना त्यांनी आपण मनात एक पोटात एक ठेवणारा व्यक्ती नाही. माझ्याकडून, सरकारकडून सकल मराठा समाजाला आरक्षण पुन्हा मिळवून देण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही त्यांनी पुन्हा दिली आहे.
काय होता वायरल व्हिडिओ
मराठा आरक्षणासाठी काल रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सरकारमधील या तीन प्रमुख नेत्यांतील संवाद तरी पाहा. “आपण बोलून मोकळं व्हायचं” हे त्यांचे उद्गार मराठा आरक्षण प्रश्नी त्यांची असलेली अनास्था दर्शवित आहे.
मराठा आरक्षणासाठी सर्व समाजबांधव… pic.twitter.com/172MQ4cxXH
— Omprakash Rajenimbalkar (@OmRajenimbalkr) September 12, 2023
#मराठाआरक्षण संदर्भात राज्य सरकारचे सकारात्मक प्रयत्न असून मराठा समाज बांधवांनी कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन करतानाच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल असा खोडसाळपणा कुणी करु नये, असे मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले. pic.twitter.com/3wz7KV1A6r
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 13, 2023
दरम्यान आज मनोज जरांगे पाटील यांचं मागील 17 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा रस देऊन त्यांनी मागे घेण्यास भाग पाडलं आहे. आता सरकारला जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी 30 दिवसांचा अवधी दिला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 14, 2023 12:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

