Chhatrapati Shivaji Maharaj Temple

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मंदिर (Chhatrapati Shivaji Maharaj Temple) बांधण्यात आले आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे उद्घाटन केले. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, ए. किशन कथीर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. हे मंदिर मुंबईजवळील भिवंडी येथे आहे आणि ते एक एकर जमिनीवर बांधले गेले आहे. हे 56 फूट उंच मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम काही वर्षांपूर्वी सुरू झाले होते. या मंदिराचे नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तीपीठ) असे ठेवण्यात आले आहे. हे मंदिर भिवंडी रोडवरील मराडे पाडा येथे बांधले आहे. तिथीनुसार आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्याने त्याचे आज अनावरण करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अरुण योगीराज यांनी बनवला आहे, ज्यांनी अयोध्येत श्री रामाची मूर्ती बनवली होती. मंदिराच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा हॉल 2500 चौरस फूट आहे. मंदिराभोवती चार बुरुज बांधण्यात आले आहेत. या शिवमंदिराच्या माध्यमातून शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा पाहायला मिळेल, असे म्हटले जाते. अनावरण होण्यापूर्वी येथे तीन दिवस कार्यक्रम सुरू होते. शिवाजी महाराजांच्या जीवनावर आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या मावळ्यांच्या चरित्रांवर आधारित कलाकृती येथे आहेत,

याबाबत सीएम देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘रयतेच्या राज्याच्या सेवेसाठी रयतेच्या राजाचे आशीर्वाद. छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे (शक्तिपीठ)' शिवक्षेत्र मराडे पाडा, भिवंडी येथे लोकार्पण केले. याप्रसंगी महाराजांचे आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. देव, देश आणि धर्मरक्षणासाठी ज्यांनी सर्वसामान्यांमध्ये प्राण ओतले आणि सर्वांच्या कल्याणासाठी रयतेचे राज्य निर्माण केले अशा युगपुरुषाला आपल्या, आराध्याला नमन करणे नवी ऊर्जा प्रदान करणारे होते. हे मंदिर सर्व शिवप्रेमींना स्वराज्याच्या जाज्वल्य मूल्यांप्रती सदैव जागृत राहण्यासाठी प्रेरित करत राहील हा विश्वास आहे.’ (हेही वाचा: एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन)

Chhatrapati Shivaji Maharaj Temple:

शिवजयंतीनिमित्त त्यांनी सांगितले की, आजच्या काळात महाराजांचे मंदिर आवश्यक आहे. येथे आपण आपल्या मंदिरात आपल्या आवडत्या देवतेची पूजा करू शकतो. शिवाजी महाराजांच्या जीवनातील सर्व घटना येथे पाहता येतील. त्यांच्याकडून प्रेरणा मिळू शकते. किल्ल्यासारखे बांधलेल्या या मंदिराला शिवप्रेमींनी नक्कीच भेट द्यावी असे आवाहन व्यवस्थापन समितीने केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की या मंदिराला तात्काळ तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येईल. महाराष्ट्रात औरंगजेबाबद्दल वाद सुरू असतानाच या मंदिराचे अनावरण करण्यात आले आहे. फडणवीस यांनी सांगितले की, एएसआयने पन्नास वर्षांपासून औरंगजेबाची कबर जतन केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने तिथेही सुरक्षा पुरवणे योग्य आहे. पण याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्रात औरंगजेबाच्या थडग्याचा कधीही गौरव होईल.