![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/05/Sonia-Gandhi-380x214.jpg)
राज्यातील 25 काँग्रेस आमदारांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांना लिहिलेल्या पत्राचे प्रकरण अजूनही गाजत आहे, अशा परिस्थितीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य विश्वबंधू राय यांनी सोनिया गांधी यांना आणखी एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी सोनिया गांधींना बजावले आहे की, भाजपला रोखण्याच्या नादात काँग्रेसने वाया घालवू नये. राय यांच्या आधीही अनेक काँग्रेसजन पत्र लिहून महाराष्ट्रातील काँग्रेसची दुर्दशा आणि त्याला कारणीभूत असलेल्या घटकांची माहिती पक्षाच्या हायकमांडला देत आहेत. सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात राय यांनी लिहिले आहे की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर ईडी, सीबीआय आणि आयकर छापे टाकत आहेत आणि त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे. पण, सरकारसोबत राहून काँग्रेसलाही त्यांच्या गैरकृत्यांचा फटका बसत आहे.
राय यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाविकास आघाडीचे सरकार ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’च्या आधारे अस्तित्वात आले असले तरी महाराष्ट्र सरकारच्या गेल्या अडीच वर्षांत काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यातील एकाही आश्वासनाची पुर्ण पूर्तता झालेली नाही. राज्यातील आगामी निवडणुकीत कोणत्या कामगिरीच्या जोरावर आम्ही जनतेकडून मते मागणार, हीच आमच्या आमदारांची चिंता आहे. (हे देखील वाचा: Sanjay Raut On UPA: यूपीएच्या मजबुतीसाठी काँग्रेसनं पुढाकार घ्यावा - संजय राऊत)
एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील आयोग, मंडळे, समित्यांमध्ये मित्रपक्षांच्या लोकांना नियुक्त्या दिल्या जात आहेत. केवळ काँग्रेसच्या कोट्यासाठी नियुक्त्या केल्या जात नाहीत. महाराष्ट्राच्या प्रभारींना पक्षातील अंतर्गत असंतोषाची जाणीव नाही आणि परिस्थिती बिकट असताना ते हाताळण्यात असमर्थ आहेत, हे आश्चर्यकारक आहे.