कराड जवळ दोन वाहनांचा भीषण अपघात झाला असून यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी आहेत.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या 29 व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी महिला कोविड वॉरियरर्सचा सन्मान केला.

हैदराबादमधील नेकलेस रोड येथील नवव्या नर्सरी मेळाव्यालाआज नागरिकांनी भेट दिली आहे. ट्विट-

 

वडोदरा मध्ये कोरोना लस दिल्यानंतर 30 वर्षीय स्वच्छता कर्मचा-याचा काही तासांत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र या कर्मचा-यास 2016 पासून हृदयाचा त्रास होता आणि तो औषध घेत नव्हता असे कुटूंबियांनी सांगितले आहे.

मुंबईत आज दिवसभरात 483 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 3,08,969 वर पोहोचली आहे.

हरियाणा सरकारकडून 14 जिल्ह्यात येत्या 1 फेब्रुवारीच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत  निलंबित राहणार  आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 सादर होण्यापूर्वी कॅबिनेटची  उद्या 10.15 वाजता संसदेत बैठक पार पडणार आहे.

गेल्या एका वर्षात वस्तूंच्या सर्वाधिक किंमतीत वाढ झाल्याचे 70 टक्क्यांहून अधिक लोकांना वाटते असे  CVoter सर्वे मधून समोर आले आहे.

पुण्यातील विमानतळाच्या धावपट्टीच्या कामासाठी येत्या 26 एप्रिल 2021 ते 9 मे 2021 पर्यंत विमान सेवा बंद ठेवली जाणार आहे.

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन 4.15 किलो जप्त करण्यात आले असून 7 जणांना अटक करण्यात आली आहे.

Load More

आज 31 जानेवारी. महिन्याचा शेवटचा रविवार. महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या आपल्या रेडिओ प्रोग्रॅममधून देशवासियांशी संवाद साधतात. नववर्षातील मन की बात चा हा पहिलाच कार्यक्रम असून आज सकाळी 11 वाजता रेडिओ, युट्युब आणि अन्य माध्यमातून प्रोग्रॅम तुम्हाला ऐकता येईल.

उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प 2021 सादर करणार आहेत. कोरोना व्हायरस संकट, त्यामुळे डळमळीत झालेली अर्थव्यवस्था, वाढलेली बेरोजगारी, शेतकरी आंदोलन या सर्व प्रश्नांवर उद्या बजेट अंतर्गत काय मोठी घोषणा होणार याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान, उद्यापासूनच सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल खुली होत आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने जोरदार तयारी सुरु केली असून नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. कोविड-19 चा धोका अद्याप टळलेला नसल्याने सर्वसामान्य नागरिक ठराविक वेळेतच लोकल प्रवास करु शकतात. त्यासाठी त्यांना मास्क घालणे, सोशल डिस्टसिंग पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असणार आहे.