Rahul Gandhi: नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे, राहुल गांधी यांची जाहीर मागणी

लोकसभा सचिवालयाने जाहीर केले की अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या आठवड्यात पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे आणि त्यांना नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी निमंत्रण दिले आहे.

Rahul Gandhi: नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे, राहुल गांधी यांची जाहीर मागणी
Rahul Gandhi | (Photo Credit - Twitter/ANI)

भारताच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हे तर राष्ट्रपतींनी करावे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी म्हटले. 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार्‍या उद्घाटन कार्यक्रमाच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी टिप्पणी केली आहे. 18 मे रोजी, लोकसभा सचिवालयाने जाहीर केले की अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या आठवड्यात पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे आणि त्यांना नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी निमंत्रण दिले आहे. यावरून विरोधी पक्षनेत्यांनी टीका केली, विधिमंडळाच्या प्रमुखाने उद्घाटन करावे, सरकारच्या प्रमुखाने नाही, असा युक्तिवाद करण्यात आला.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) चे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी या महत्त्वपूर्ण कार्यासाठी लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या अध्यक्षांची निवड का केली नाही, असा प्रश्न केला आहे. ट्विटरवर ओवेसी यांनी लिहिले की, "पंतप्रधानांनी संसदेचे उद्घाटन का करावे? ते कार्यकारिणीचे प्रमुख आहेत, कायदेमंडळाचे नाही. आमच्याकडे अधिकारांचे पृथक्करण आहे लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या अध्यक्षांचीउद्घाटन करू शकले असते. हे जनतेच्या पैशाने केले जाते, का? पंतप्रधान त्यांच्या 'मित्रांनी' त्यांच्या खाजगी निधीतून प्रायोजित केल्यासारखे वागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नवीन संसदेची इमारत, त्रिकोणी रचना आणि 64,500 स्क्वेअर मीटरच्या बिल्ट-अप क्षेत्रासह आकर्षक चार मजली संरचना, याला काँग्रेसने पंतप्रधान मोदींचा व्हॅनिटी प्रोजेक्ट म्हणून संबोधले आहे. त्याची पायाभरणी 10 डिसेंबर 2020 रोजी झाली, दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक झाल्यास एकूण 1,280 सदस्य बसू शकतील अशी या इमारतीची क्षमता आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 21, 2023 03:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).