Pakistan Violates Ceasefire: नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर

दोन रात्रींमध्ये पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्याला चिथावणी देण्याचा प्रयत्न करण्याची ही दुसरी वेळ आहे. जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी सैन्याला वेगळी करणाऱ्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील अनेक चौक्यांवरून गोळीबार करण्यात आला.

Pakistan Violates Ceasefire: नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
Pakistan violates ceasefire again (फोटो सौजन्य - Edited Image)

Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानी सैन्याने 25 आणि 26 एप्रिलच्या मध्यरात्री काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (LOC) अनावश्यक गोळीबार (Firing) केला. त्यानंतर भारतीय सैन्याने (Indian Army) पाकिस्तानी सैन्याला योग्य प्रत्युत्तर दिले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. दोन रात्रींमध्ये पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्याला चिथावणी देण्याचा प्रयत्न करण्याची ही दुसरी वेळ आहे. जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी सैन्याला वेगळी करणाऱ्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील अनेक चौक्यांवरून गोळीबार करण्यात आला.

भारतीय सैन्याकडून निवेदन जारी -

भारतीय सैन्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 25-26 एप्रिल 2025 च्या रात्री, काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या विविध चौक्यांकडून गोळीबार करण्यात आला. भारतीय सैन्याने लहान शस्त्रांनी योग्य प्रत्युत्तर दिले. कोणतीही जीवितहानी झाली नाही. (हेही वाचा - BSF Jawan Crosses Border: बीएसएफ जवान पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात,सीमा ओलांडल्याने फिरोजपूरजवळ कारवाई)

भारताने पाकिस्तानविरुद्ध उचलली कठोर पावले -

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्ताविरोधात कठोर राजकीय निर्णय घेतले आहे. यामध्ये 65 वर्षे जुना सिंधू जल करार रद्द करणे, अटारी जमीन सीमा ओलांडणे बंद करणे आणि पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे यासह पाकिस्तानी लष्करी राजदूतांना देशातून हद्दपार करणे या निर्णयांचा समावेश आहे. तथापि, भारताने अटारी सीमेवरून प्रवेश करणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना 1 मे पर्यंत देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. (हेही वाचा, Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना Amit Shah, Rahul Gandhi यांच्याकडून 2 मिनिटं मौन बाळगत श्रद्धांजली अर्पण)

दरम्यान, भारताच्या या निर्णयाला प्रतिउत्तर म्हणून पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. याव्यतिरिक्त, इस्लामाबादने भारताच्या सिंधू जल कराराच्या निलंबनाला नकार दिला आणि इशारा दिला की, पाकिस्तानच्या वाट्याचे पाणी रोखण्याचा कोणताही प्रयत्न युद्धाची कृती मानला जाईल.

(The above story first appeared on LatestLY on Apr 26, 2025 09:39 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).