Govt Grants Navratna Status To IRCTC And IRFC: मोदी सरकारने आयआरसीटीसी आणि आयआरएफसीला दिला नवरत्न कंपनीचा दर्जा

सार्वजनिक उपक्रम विभागाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. पोस्टनुसार, आयआरसीटीसी आणि आयआरएफसी यांना 25 वे आणि 26 वे नवरत्न सीपीएसई बनवण्यात आले आहे.

Govt Grants Navratna Status To IRCTC And IRFC: मोदी सरकारने आयआरसीटीसी आणि आयआरएफसीला दिला नवरत्न कंपनीचा दर्जा
Navratna Company Status to IRCTC And IRFC (फोटो सौजन्य - X/@AshwiniVaishnaw)

Navratna Company Status to IRCTC And IRFC: सरकारने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC) या सरकारी कंपन्यांना 'नवरत्न' दर्जा (Navratna Status) दिला आहे. सोमवारी सरकारने या दोन्ही कंपन्यांना नवरत्न कंपनीचा दर्जा दिला आहे. सार्वजनिक उपक्रम विभागाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. पोस्टनुसार, आयआरसीटीसी आणि आयआरएफसी यांना 25 वे आणि 26 वे नवरत्न सीपीएसई बनवण्यात आले आहे.

आयआरसीटीसी ही रेल्वे मंत्रालयाचा एक केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे, ज्याची वार्षिक उलाढाल 4,270.18 कोटी रुपये आहे. याशिवाय, सार्वजनिक उपक्रम विभागाने एका वेगळ्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की IRFC ही रेल्वे मंत्रालयाची एक CPSE आहे, ज्याची वार्षिक उलाढाल 26,644 कोटी रुपये आहे. तसेच या कंपनीचा करपश्चात नफा (PAT) 6,412 कोटी रुपये आहे. (हेही वाचा -Ashwini Vaishnaw On Mumbai Local: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आता फक्त 2 मिनिटांत मिळणार लोकल ट्रेन)

दरम्यान, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी X वरील एका पोस्टमध्ये आयआरसीटीसी आणि आयआरएफसी कंपन्यांना 'नवरत्न' दर्जा मिळवून देण्यात दिलेल्या योगदानाबद्दल अभिनंदन केले. अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'नवरात्न दर्जा मिळाल्याबद्दल टीम आयआरसीटीसी आणि टीम आयआरएफसीचे अभिनंदन.' (हेही वाचा - First Made-in-India Semiconductor Chip: भारत पहिली मेड-इन-इंडिया सेमीकंडक्टर चिप 205 पर्यंत तयार करेल- अश्विनी वैष्णव)

'नवरत्न' दर्जा मिळाल्याने काय फायदा होणार?

अपवादात्मक आर्थिक आणि बाजार कामगिरी असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना (PSUs) नवरत्न दर्जा दिला जातो. या हालचालीमुळे त्यांचे मूल्य ओळखता येते आणि त्यांना त्यांच्या आर्थिक शक्तींचा विस्तार करता येतो. 'नवरत्न' दर्जाचा एक फायदा म्हणजे कंपन्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळते, ज्यामुळे त्यांना केंद्र सरकारची पूर्वपरवानगी न घेता एकाच प्रकल्पावर 1 हजार कोटी रुपयांपर्यंत किंवा त्यांच्या निव्वळ संपत्तीच्या 15 टक्के गुंतवणूक करता येते.

(The above story first appeared on LatestLY on Mar 03, 2025 08:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).