Shiv Sena Activists Bittu Sikheda

मुघल शासक औरंगजेबाची कबर (Aurangzeb's Tomb) हटवण्यावरून देशभरात गोंधळ सुरू आहे. या वादावरून महाराष्ट्रातील नागपूरमध्ये हिंसक दंगल झाली. आता हे प्रकरण उत्तर प्रदेशातही पेटत आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये (Muzaffarnagar) औरंगजेबाची कबर फोडणाऱ्या व्यक्तीला 5 बिघा जमीन आणि 11 लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी मुझफ्फरनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नागपूर घटनेच्या विरोधात शेकडो शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठे निदर्शने केली. निदर्शनादरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेब मुर्दाबाद आणि भारत माता जिंदाबादच्या घोषणा दिल्या. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा दिल्या.

निषेधादरम्यान, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांना उद्देशून जिल्हा दंडाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले, ज्यामध्ये मुघल शासक औरंगजेबासह सर्व परदेशी मुघल शासकांच्या कबरी आणि त्यांच्या नावावर असलेल्या रस्त्यांची आणि स्मारकांची नावे काढून टाकण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच, नागपूर घटनेतील सर्व दोषी आणि औरंगजेबाचे समर्थन करणाऱ्या सर्व जिहादींचे भारतीय नागरिकत्व रद्द करावे आणि त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करावा आणि त्यांना पाकिस्तान आणि बांगलादेशला पाठवावे अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.

निषेधादरम्यान शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बिट्टू शिखेडा यांनी मोठी घोषणा करत म्हटले की, जो कोणी औरंगजेबाची कबर उध्वस्त करेल त्याला 5 बिघा जमीन आणि 11 लाख रुपये बक्षीस म्हणून दिले जातील. सभेला संबोधित करताना, शिखेडा यांनी मागणी केली की, औरंगजेबाशी संबंधित ऐतिहासिक स्थळे देशातून काढून टाकावीत. हे निदर्शन अशा वेळी झाले जेव्हा, काल नागपुरात औरंगजेबावरून दोन समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाल्याचे वृत्त आले होते. मुझफ्फरनगरमध्ये शिवसेनेने केलेल्या या निदर्शनामुळे स्थानिक पातळीवरही या मुद्द्याला चालना मिळाली आहे. (हेही वाचा: Uddhav Thackeray on Nagpur Violence: ‘डबल इंजिन सरकार अपयशी ठरले, त्यांनी राजीनामा द्यावा’: नागपूर हिंसाचारावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया)

Aurangzeb Tomb Row:

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि सातारा येथील भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनीही औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली होती. यानंतर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनीही या प्रकरणात उडी घेतली. आता छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या थडग्यावर सुरक्षा कर्मचाऱ्यांची तैनाती वाढवण्यात आली आहे.