आज स्टायरिन गळती होत असलेल्या टँकरमधून पुन्हा गॅसचे धुके गळत आहेत. एनडीआरएफच्या सहकार्याने अग्निशमन दलाचे सुमारे 50 कर्मचारी कार्यरत आहेत. खबरदारीसाठी आम्ही 2-3 किमीच्या अंतरावरील गावे रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत: विशाखापट्टणम जिल्हा अग्निशमन अधिकारी संदीप आनंद
Gas fumes leaking again from the tanker where there was Styrene leakage today. Around 50 fire staffers, with NDRF's support, are carrying out operation. We've ordered evacuation of villages in 2-3 km radius for safe side precautions: Visakhapatnam Dist Fire Officer Sandeep Anand pic.twitter.com/RVtdGYllQK— ANI (@ANI) May 7, 2020
7 मे रोजी संध्याकाळी वर्षाचा शेवटचा संपूर्ण सुपरमून भारताच्या दिल्ली शहरातून दिसला. सुपरमून भारतात बुद्ध पौर्णिमेला पाहायला मिळाला. पाहा राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील हे फोटोज
Visuals of Super Flower Moon from India Gate in Delhi. pic.twitter.com/Z9WHcOdfFB— ANI (@ANI) May 7, 2020
अबुधाबीमध्ये लॉकडाउनमुळे अडकलेल्या भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे एक्सप्रेस विमान काही वेळापूर्वी केरळच्या कोची एअरपोर्टवर उतरले.
#WATCH: First repatriation Air India Express flight from Abu Dhabi lands at Cochin International Airport in Kerala. #VandeBharatMission pic.twitter.com/6CoZMXtJx4— ANI (@ANI) May 7, 2020
मुंबईकरांच्या चिंतेत आज आणखी भर पडली. शहरात कोरोना बाधितांची संख्या 11,219 वर पोहचली असून नवीन 692 रुग्ण समोर आले आहेत, तर 25 लोकांनी जीव गमावला. मुंबईमध्ये आजवर मृतांचा आकडा 437 इतका आहे.
Mumbai's coronavirus case tally soars to 11,219 with addition of 692 new cases; with 25 more deaths, toll reaches 437: BMC— Press Trust of India (@PTI_News) May 7, 2020
पालघर जिल्ह्यातील एसपी गौरव सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येणार असल्याची माहिती, महाराष्ट्रचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
Palghar district SP Gaurav Singh to be sent on compulsory leave, says Maharashtra Home Minister Anil Deshmukh after visiting mob lynching spot— Press Trust of India (@PTI_News) May 7, 2020
मध्यरात्रीपासून राजस्थान सरकार पेट्रोलवर 2 आणि डिझेलवर 1 टक्के व्हॅट वाढवला आहे.
Rajasthan Government hikes value-added tax (VAT) on petrol by 2% and on diesel by 1% with effect from midnight.— ANI (@ANI) May 7, 2020
इतर देशांतून परत आणल्या जाणार्या भारतीय नागरिकांना अलग ठेवण्यासाठी मुंबईतील 88 हॉटेल्समधील 3,343 खोल्यांमध्ये क्वारंटाइनमध्ये ठेवले जाणार असल्याचे बीएमसीने म्हटले.
Have reserved 3,343 rooms in 88 hotels in Mumbai to quarantine Indian nationals who would be brought back from other countries: BMC— Press Trust of India (@PTI_News) May 7, 2020
नाशिकमधील सतनपूर भागातील एका कारखान्यात आज आग लागली. अग्निशामकघटनास्थळी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य सुरु आहे.
Maharashtra: Fire broke out at a factory in Satanpur area of Nashik today. 10 fire tenders at the spot. pic.twitter.com/U6FWleye2n— ANI (@ANI) May 7, 2020
महाराष्ट्रात 48.14 कोटी रुपयांच्या दारुची विक्री झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुक्ल विभागाकडून देण्यात आली आहे.
Since May 4 liquor worth Rs 48.14 crore has been sold in Maharashtra: State Excise Department
On May 3, Maharashtra govt allowed standalone shops including liquor shops to open except for the containment zones,however,some districts have amended the decision & shut liquor shops.— ANI (@ANI) May 7, 2020
मध्य प्रदेशात आणखी 114 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 3252 वर पोहचला आहे.
आज गौतम बुद्धांचा जन्म आणि निर्वाण दिन म्हणजेच बुद्धपौर्णिमा. बौद्ध धर्मीयांसाठी खास असणाऱ्या हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये अगदी उत्साहाने साजरा केला जातो. मात्र यंदा सर्वत्र कोरोना व्हायरसचे सावट असल्याने बौद्धपौर्णिमेच्या उत्सावाला साधं स्वरुप प्राप्त झालं आहे. दरम्यान कोरोना व्हायरसचा प्रभाव देशभरात वाढत असल्याने लॉकडाऊनचा कालावधी मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये काहीशी मोकळीक देण्यात आली आहे.
तसंच लॉकडाऊनमुळे अमेरिकेच्या विविध शहरांमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी एअर इंडियाने 9-15 मे दरम्यान विशेष फ्लाईट्सची सोय केली आहे. तसंच प्रवासाच्या तिकीट दराची किंमत अमेरिकेच्या कोणत्या शहरातून भारतातील कोणत्या शहरापर्यंत प्रवास होणार आहे यावरुन ठरेल, असे वॉशिंग्टनमधील इंडियन एम्बासीकडून सांगण्यात आले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कोरोना व्हायरसचे संकट देशात अधिकाधिक तीव्र होत चालल्याचे चित्र दिसत आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 49391 वर पोहचला असून त्यातील 14183 रुग्ण रिकव्हर झाले आहेत. तर आतापर्यंत 1694 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 33514 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिलासादायक आहे.