अंमलबजावणी संचालनालय गोवा यांनी मुंबई व गोव्यात असलेल्या Full-Fledged Money Changers च्या विविध ठिकाणी परकीय विनिमय व्यवस्थापन कायद्यांतर्गत शोध घेतला. भारतीय चलन एकूण रु. 44.37 लाख रुपये आणि विविध प्रकारच्या विदेशी चलने रू. 9.55 लाख जप्त केले.
Enforcement Directorate Goa conducted searches under Foreign Exchange Management Act at various locations of Full-Fledged Money Changers situated in Mumbai & Goa. Indian currency totalling to Rs. 44.37 lakhs & assorted foreign currencies amounting to Rs. 9.55 lakhs seized: ED— ANI (@ANI) March 5, 2021
Vijay Wadettiwar tested positive for Covid-19: विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण झाली असून संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याची विनंती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
मागील 2 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांनी ,नागरिकांनी सुद्धा आपली काळजी घ्यावी ही विनंती . (2/2)— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 5, 2021
मुथूट ग्रुपचे चेअरमन MG George Muthoot यांचे आज दिल्लीत निधन झाले.
Muthoot Group Chairman MG George Muthoot passed away today in Delhi.— ANI (@ANI) March 5, 2021
कोची: सीमा शुल्क विभागाने केरळ विधानसभा अध्यक्ष पी. श्रीरामकृष्णन यांना डॉलर तस्करी प्रकरणी 12 मार्च रोजी समन्स बजावले आहे.
Kochi: Customs Department summons Kerala Assembly Speaker P Sreeramakrishnan for Dollar Smuggling case on March 12 #Kerala— ANI (@ANI) March 5, 2021
मनसुख हिरेन आत्महत्या करु शकत नाहीत. मात्र या प्रकरणाचा तपास खोलवर करावा असे पत्नी विमल हिरेन यांनी म्हटले आहे. मनसुख हिरेन यांच्या संशायस्पद मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी समाजमाध्यमांशी संवाद साधला.
नागपूर जिल्ह्यात 6-7 मार्च रोजी बंद पाळण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
शनिवार रविवार जिल्ह्यात नागरिकांनी बंद पाळावा ;
गरज नसेल तर बाहेर पडू नका - @NitinRaut_INC
१४ मार्चपर्यत #लॉकडाऊन मध्ये वाढ लसीकरण गतिमान करणार, अत्यावश्यक सेवा वगळून शाळा-महाविद्यालये व्यापारी प्रतिष्ठाने, मद्यविक्री दुकाने बंद@MahaDGIPR @ngpnmc @InfoVidarbha @CMOMaharashtra— DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR (@InfoNagpur) March 5, 2021
योगी आदित्यनाथ सरकार जगभरातील रामभक्तांना एक अनोखी भेट देणार आहे. ग्लोबल विश्वकोश रामायण ची पहिली आवृत्ती प्रकाशनासाठी तयार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शनिवारी जानकी नवमीनिमित्त या ऐतिहासिक आवृत्तीचे अनावरण करतील.
The #YogiAdityanath govt is going to give a unique gift to Ram devotees across the world.
The first edition of the Global Encyclopaedia of the Ramayana is ready for publication. CM @myogiadityanath will release the historical edition on the occasion of Janaki Navami on Saturday. pic.twitter.com/7LtDaCCB3X— IANS Tweets (@ians_india) March 5, 2021
महाराष्ट्रात आज 10216 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6467 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2055951 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 88838 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.52% झाले आहे.
राज्यात आज 10216 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6467 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2055951 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 88838 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.52% झाले आहे.#CoronaVirusUpdates— Rajesh Tope (@rajeshtope11) March 5, 2021
Coronavirus in Maharashtra: आज राज्यात 10,216 कोरोना बाधित रुग्णांची मोठी वाढ झाली असून 53 जणांचा मृत्यू झाला आहे.
एकूण रुग्णसंख्या- 21,98,399
कोरोनावर मात केलेल्यांची संख्या- 20,55,951
मृतांचा आकडा- 52,393
सक्रीय रुग्ण- 88,838
Maharashtra reports 10,216 new #COVID19, 6467 discharges and 53 deaths in the last 24 hours.
Total cases 21,98,399
Total recoveries 20,55,951
Death toll 52,393
Active cases 88,838 pic.twitter.com/qIYAab37W3— ANI (@ANI) March 5, 2021
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास ए.टी.एस. कडे देण्याची घोषणा महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
देशातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या कमी झाली असली तरी ती संपलेली नाही. देशातील अनेक राज्यांमधून कोरोना संक्रमितांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही स्थिती आणकी वाढू नये अथवा बिकट होऊ नये यासाठी राज्य सरकारं आणि केंद्र सरकार प्रयत्नशिल आहे. दुसऱ्या बाजूला लसीकरण उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तीन पक्ष प्रामुख्याने सहभागी आहेत. अत्यंत वेगवेगळ्या अशा विचारांचे असलेले हे पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे त्यांच्यात मतमतांतरे असणे हे सहाजिक आहे. त्यावरुन अनेकदा या तिन्ही पक्षांमध्ये संघर्षही होताना दिसतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बाबरी मशीद पाडकामावरुन व्यक्त केलेल्या विधानावरुन असाच संघर्ष निर्माण होतो की काय अशी चर्चा होती. मात्र, यावर अपवाद वगळता बऱ्याच नेत्यांनी मौन बाळगले आहे.
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबत महाराष्ट्र काँग्रेसने व्यक्त केलेल्या मतावरुन सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. स्वातंत्र्यावीर सावरकर यांना भारतरत्न किताब देण्याबाबत विधिमंडळात प्रस्ताव आला आणि जनभावना जर त्या प्रस्तावाच्या बाजूने असेल तर काँग्रेसही या प्रस्तावाला पाठिंबा देईल, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात महिला अत्याचार प्रकरणांवरुन विरोधी पक्षांनी जोरदार आवाज उठवला आहे. यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन वनमंत्री संजय राठोड यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. तर दुसऱ्या बाजूला जळगावमधील एका महिला वसतीगृहात महिलांना कपडे काडून डान्स करायला लावल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने सहा महिला अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली होती.