गुरुवार, सप्टेंबर 03, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 3 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: राहुल गांधींचा नाशिक दौरा, कांद्याच्या दरात वाढ & डेंग्यू रुग्णांची वाढ | पुणे, 3 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: संतोष पंडित अटक, मोदींच्या फोटोचा वाद, पालकांना मारहाण & पीएनजी कनेक्शनची अंतिम मुदत | मुंबई, 3 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: बीएमसी लाचखोरी, कोकणसाठी नवी ट्रेन, पाणी कपात & आरटीओ लाचखोरी आरोप |

अंमलबजावणी संचालनालय गोवा यांच्याकडून भारतीय चलन 44.37 लाख आणि विदेशी चलन 9.55 लाख जप्त; 5 मार्चच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या अण्णासाहेब चवरे | Mar 06, 2021 12:03 AM IST
A+
A-
06 Mar, 00:03 (IST)

अंमलबजावणी संचालनालय गोवा यांनी मुंबई व गोव्यात असलेल्या Full-Fledged Money Changers च्या विविध ठिकाणी परकीय विनिमय व्यवस्थापन कायद्यांतर्गत शोध घेतला. भारतीय चलन एकूण रु. 44.37 लाख रुपये आणि विविध प्रकारच्या विदेशी चलने रू. 9.55 लाख जप्त केले.

05 Mar, 23:17 (IST)

Vijay Wadettiwar tested positive for Covid-19: विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण झाली असून संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याची विनंती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

05 Mar, 22:48 (IST)

मुथूट ग्रुपचे चेअरमन MG George Muthoot यांचे आज दिल्लीत निधन झाले.

05 Mar, 22:41 (IST)

कोची: सीमा शुल्क विभागाने केरळ विधानसभा अध्यक्ष पी. श्रीरामकृष्णन यांना डॉलर तस्करी प्रकरणी 12 मार्च रोजी समन्स बजावले आहे.

05 Mar, 22:00 (IST)

मनसुख हिरेन आत्महत्या करु शकत नाहीत. मात्र या प्रकरणाचा तपास खोलवर करावा असे पत्नी विमल हिरेन यांनी म्हटले आहे. मनसुख हिरेन यांच्या संशायस्पद मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी समाजमाध्यमांशी संवाद साधला.

05 Mar, 21:48 (IST)

नागपूर जिल्ह्यात 6-7 मार्च रोजी बंद पाळण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

05 Mar, 21:23 (IST)

योगी आदित्यनाथ सरकार जगभरातील रामभक्तांना एक अनोखी भेट देणार आहे. ग्लोबल विश्वकोश रामायण ची पहिली आवृत्ती प्रकाशनासाठी तयार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शनिवारी जानकी नवमीनिमित्त या ऐतिहासिक आवृत्तीचे अनावरण करतील.

05 Mar, 20:28 (IST)

महाराष्ट्रात आज 10216 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6467 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2055951 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 88838 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.52% झाले आहे.

05 Mar, 20:28 (IST)

Coronavirus in Maharashtra: आज राज्यात 10,216 कोरोना बाधित रुग्णांची मोठी वाढ झाली असून 53 जणांचा मृत्यू झाला आहे.

एकूण रुग्णसंख्या- 21,98,399

कोरोनावर मात केलेल्यांची संख्या- 20,55,951

मृतांचा आकडा- 52,393

सक्रीय रुग्ण- 88,838

05 Mar, 19:51 (IST)

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास ए.टी.एस. कडे देण्याची घोषणा महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. 

 

Load More

देशातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या कमी झाली असली तरी ती संपलेली नाही. देशातील अनेक राज्यांमधून कोरोना संक्रमितांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही स्थिती आणकी वाढू नये अथवा बिकट होऊ नये यासाठी राज्य सरकारं आणि केंद्र सरकार प्रयत्नशिल आहे. दुसऱ्या बाजूला लसीकरण उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तीन पक्ष प्रामुख्याने सहभागी आहेत. अत्यंत वेगवेगळ्या अशा विचारांचे असलेले हे पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे त्यांच्यात मतमतांतरे असणे हे सहाजिक आहे. त्यावरुन अनेकदा या तिन्ही पक्षांमध्ये संघर्षही होताना दिसतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बाबरी मशीद पाडकामावरुन व्यक्त केलेल्या विधानावरुन असाच संघर्ष निर्माण होतो की काय अशी चर्चा होती. मात्र, यावर अपवाद वगळता बऱ्याच नेत्यांनी मौन बाळगले आहे.

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबत महाराष्ट्र काँग्रेसने व्यक्त केलेल्या मतावरुन सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. स्वातंत्र्यावीर सावरकर यांना भारतरत्न किताब देण्याबाबत विधिमंडळात प्रस्ताव आला आणि जनभावना जर त्या प्रस्तावाच्या बाजूने असेल तर काँग्रेसही या प्रस्तावाला पाठिंबा देईल, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात महिला अत्याचार प्रकरणांवरुन विरोधी पक्षांनी जोरदार आवाज उठवला आहे. यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन वनमंत्री संजय राठोड यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. तर दुसऱ्या बाजूला जळगावमधील एका महिला वसतीगृहात महिलांना कपडे काडून डान्स करायला लावल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने सहा महिला अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली होती.

SocialLY


Show Full Article Share Now
Close
Latestly whatsapp channel