बुधवार, सप्टेंबर 09, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Muse App: मेटाने आणला भलताच AI एजंट!शॉपिंग ते बुकिंग, सगळं एआय करणार, मेटाचा नवा चमत्कार | Xiaomi Skynomad N70 Photos: एका चार्जमध्ये मुंबई ते थेट दिल्ली? शाओमीची 1461 किमी धावणारी नवी SUV बाजारात; भारतात प्रवेशाबाबत पुष्टी नाही | Pune MHADA Lottery Income Proof: 15 सप्टेंबरच्या मुदतीपूर्वी म्हाडाचा अर्जदारांना अनपेक्षित दिलासा; उत्पन्नाच्या दाखल्याची 'ती' सक्ती अखेर रद्द |

महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी कोरोना विषाणूची लागण; 29 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या अण्णासाहेब चवरे | Dec 29, 2020 11:50 PM IST
A+
A-
29 Dec, 23:48 (IST)

महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी कोरोना विषाणूची लागण झाली आहे. भुसे यांनी स्वतः ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

29 Dec, 23:20 (IST)

असम येथे आज 66 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 16 हजार 63 वर पोहचली आहे. ट्वीट-

 

29 Dec, 22:54 (IST)

तामिळनाडूमध्ये आज कोरोना विषाणूच्या 957 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संख्या 8.16 लाखावर गेली आहे. सध्या राज्यात 8,747 हजार सक्रीय रुग्ण असून, आजच्या 12 मृत्युंसह एकूण मृत्यूंची संख्या 12,092 हजारावर पोहोचली आहे.

29 Dec, 22:00 (IST)

काल युरोप आणि मध्यपूर्वेहून 664 प्रवासी दाखल झाले, त्यापैकी 361 प्रवाशांना मुंबईत वेगळे ठेवण्यात आले आणि 254 प्रवासी अन्य राज्यात पाठविण्यात आले. त्यापैकी 49 लोकांना Institutional Quarantine मधून सोडण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने ही माहिती दिली.

29 Dec, 21:36 (IST)

798.500 ग्रॅम वजनाच्या आणि 40.72 लाख किमतीच्या 24 कॅरेट शुद्ध दोन अपूर्ण सोनसाखळ्या त्रिची विमानतळावर प्रवाशाकडून जप्त करण्यात आल्या आहेत. हा प्रवासी सिंगापूरहून आला होता. सोन्याच्या साखळ्या हातात असलेल्या सामानात लपवून ठेवल्या होत्या. एअर इंटेलिजेंस युनिट (एआययू), त्रिची विमानतळ, तामिळनाडू यांनी याबाबत माहिती दिली.

29 Dec, 21:13 (IST)

तामिळनाडूच्या पुडुकोट्टाई जिल्ह्यात 7 वर्षाच्या दलित मुलीवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपीला दुप्पट फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

29 Dec, 20:52 (IST)

मुंबईतील एका खाजगी कंपनीने इंडियन ओव्हरसीज बँकेचे 297.80 कोटी रुपयांचे नुकसान केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सीबीआयने कंपनीतील 24 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. ट्विट-

 

29 Dec, 19:58 (IST)

इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर A Special English Hour कार्यक्रम सुरु होणार  आहे. हा कार्यक्रम 4 जानेवारीपासून दुपारी 3.30 आणि 5.00 वाजता प्रदर्शित केला जाणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. ट्विट-

 

29 Dec, 19:27 (IST)

मुंबईतील सर्व शाळा १५ जानेवारीपर्यंत बंदच राहणार आहेत, असा निर्णय महानगरपालिकेने घेतला  आहे. ट्वीट-

 

29 Dec, 18:53 (IST)

उत्तराखंड येथे आज आणखी 317 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 6 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्विट-

 

Load More

नववर्षाच्या स्वागतासाठी आता काही तासच उरले आहेत. त्यामुळे अवघे जग नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे. परंतू यंदाचे वर्ष हे नेहमीप्रमाणे नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याचे नाही. अवघ्या जगावर कोरोना व्हायरस संसर्गाचे सावट आहे. प्रत्येक वेळी कोरोनाचा नवनवाच स्टेन्स निर्माण होत आहे. त्यामुळे संशोधकांसोमर लस निर्मिती करताना आणि डॉक्टरांसमोर उपचार करताना मोठी समस्या निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा नववर्ष जल्लोष घरातूनच साजरा करावा लागणार आहे. राज्य सरकारनेही तसेच अवाहन केले आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाने अवाहन करताना म्हटले आहे की, यंदा नववर्ष घरातूनच साजरे करा. फटाक्यांची आतषबाजी, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आदींच्या आयोजनावर बंदी आहे. त्यामुळे असे कार्यक्रम जाहीरपणे, सर्वजनिक ठिकाणी करणे टाळा. असे कार्यक्रम आपापल्या घरांतूनच साजरे करा.

एका बाजूला नववर्षाचे स्वागत कोरोनासोबतच्या संघर्षाने होत आहे. दुसऱ्या बाजूला देशभरातील शेतकऱ्यांचे नववर्ष हे केंद्र सरकारसोबतच्या संघर्षाने सुरु होते की काय असे चिन्ह आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात अद्यापही समाधानकारक चर्चा होऊन तोडगा निघाला नाही. त्यामुंळे केद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर सुरु केलेले आंदोलन अद्यापही कायम आहे. दरम्यान, केंद्र सरकारने आता पुन्हा एकदा शेतकरी संघटनेच्या प्रस्तावाला प्रतिसाद देत केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बुधवारी दुपारी 2 वाजताची वेळ दिली आहे. ठरलेल्या वेळेनुसार केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात काय चर्चा होते याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस धाडली आहे. या नोटीशीवरुन राजकीय वातावरण जोरदार तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. संजय राऊत यांनी नोटीस प्रकरणात काल पत्रकार परिषद घेऊन सरकार आणि ईडीवर जोरदार निशाणा साधला आहे. तर 'कर नाही तर डर कशाला' असे म्हणत भाजप नेत्यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. हा संघर्ष इतक्यात थांबण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे आगामी काळात आणखी काय काय पाहायला मिळते हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, राजकारण, अर्थकारण, सामाजकारण, संस्कृती, कृषी आरोग्य, संशोधन, उद्योग यांसह जगभरातील घटना, घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग पाहात राहा. लेटेस्टली सोबत जोडलेले राहा.

SocialLY


Show Full Article Share Now
Close
Latestly whatsapp channel