झारखंड येथे आज आणखी 214 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर, 7 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7 हजार 841 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. एएनआयचे ट्वीट- 

  

मुंबईतील कोविड19 परिस्थितीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली आहे. या बैठकीला मुंबई उपनगर जिल्हा राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. एएनआयचे ट्वीट- 

  

ट्रॅफिक पोलिसांना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मोहिमेअंतर्गत 10 स्पोर्ट्स बाईक 'गिक्सर 250 एसएफ' मिळाली आहेत. एएनआयचे ट्वीट- 

 

मुंबई मध्ये मागील 24 तासात 1090 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 617 जणांना आजच्या दिवसात डिस्चार्ज मिळाला असून 52 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोना रुग्ण वाढीचा दार 66 दिवसांंवर पोहचला आहे , तर आजवर एकूण 78,877 जण कोरोनमुक्त झाल्याने बरे झालेल्या रुग्णांचा दर 73  % इतका आहे. एकंदरीत कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 79 हजार 81 वर पोहचली असून सध्या 23,071  ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.  

महाराष्ट्रात मागील 24 तासात 9,251  कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तसेच दिवसभरात 257 मृत्यूंची नोंद सुद्धा झाली आहे. यानुसार राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या 3,66,368 वर पोहचली आहे, यातील 1,45,481 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर 2,07,194  जणांना आजवर डिस्चार्ज मिळाला आहे.

मध्य प्रदेश राज्यात आजच्या दिवसभरात कोरोनाचे 716 नवे कोरोना रुग्ण, 8 मृत्यू नोंदवले गेले आहेत, यानुसार राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 26,926 वर पोहचली आहे. यापैकी 7,639 ऍक्टिव्ह रुग्ण असून 799 जणांचा आजवर मृत्यू झाला आहे.  

मुंबईत कोविड19 चाचणी वाढवण्याबाबत महाराष्ट्र विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

केरळमध्ये आज 1 हजार 103 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 3 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 9 हजार 420 पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

धारावीत आज आणखी 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांच्या संख्येने 2 हजार 529 चा आकडा गाठला आहे. एएनआयचे ट्वीट- 

   

Load More

कोरोना व्हायरस संकटाचा वेढा कायम असला तरी, लॉकडाऊच्या कचाट्यातून महाराष्ट्र हळूहळू बाहेर पडू पाहतोय. महाराष्ट्र सरकारही लॉकडाऊन नियमांमध्ये काहीशी शिथिलता देऊन राज्याचे अर्थचक्र सुरु करु पाहतेय. त्याचे फायदे तोटे नजीकच्या काळात पाहायला मिळतीलच. तूर्तास तरी, येत्या 1 ऑगस्टपासून राज्यातील मॉल्स आणि व्यापारी संकुले सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. राज्यातील जनता आणि उद्योग, व्यावसायिकांसाठी हा एक मोठा दिलासाच म्हणायचा.

दरम्यान, एकूण चित्र पाहता आता राज्यातील टाळेबंदी लवकर हटवूया अशाच विचारांप्रत राज्य सरकार आल्याचे दिसते. प्रसारमाध्यमांतूनही तशाच आशयाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. असे असले तरी उद्योग, व्यवसाय आणि सार्वजनिक सेवांचे ठिक आहे. परंतू, शाळा, महाविद्यालयांचे काय? हा प्रश्न आहेच. मात्र, केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे पाहून महाराष्ट्र सरकार हा निर्णय घेईल असे दिसते. म्हणजे केंद्राच्या निर्णयापर्यंत तूर्तास तरी वाट पाहावी लागणार आहे.

दरम्यान, राज्यातील मॉल्स आणि संकुले सुरु करण्यास परवानगी मिळाली असली तरी मोठी हॉटेल्स आणि उपहारगृहांचे काय? याबाबतही उत्सुकता आहे. नाही म्हणायला निवासी व्यवस्था असलेली विश्रामगृह, हॉटेल्स (लॉजिंग आणि बोर्डिंग) सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. परंतू, हॉटेल्स खुली केल्यास होणारी संभाव्य गर्दी विचारात घेता हा निर्णय कसा घेतला जातो याबाबत उस्तुकता आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस, लॉकडाऊन यांसोबतच स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटना, घडामोडी, त्याचे अद्ययावत तपशील आणि ठळक मुद्दे जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.