झारखंड येथे आज आणखी 214 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर, 7 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7 हजार 841 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट-
214 #COVID19 cases, 167 recovered/discharged and 7 deaths reported in Jharkhand today. Total number of cases in the state is now at 7,841, including 4,237 active cases, 3,521 recovered/discharged and 83 deaths: State Health Department pic.twitter.com/C13GXg64uE— ANI (@ANI) July 25, 2020
मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. एएनआयचे ट्वीट-
Prime Minister Narendra Modi to address the nation through his radio programme 'Mann Ki Baat' at 11 AM tomorrow. (file pic) pic.twitter.com/kuqCiUMNpv— ANI (@ANI) July 25, 2020
मुंबईतील कोविड19 परिस्थितीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली आहे. या बैठकीला मुंबई उपनगर जिल्हा राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. एएनआयचे ट्वीट-
Maharashtra CM Uddhav Thackeray holds meeting with State Chief Secretary Sanjay Kumar, Guardian Minister of Mumbai Suburban district Aaditya Thackeray and other officials over #COVID19 situation in #Mumbai; outside visuals from Balasaheb Thackeray Memorial site. pic.twitter.com/0NzDuYGlXY— ANI (@ANI) July 25, 2020
ट्रॅफिक पोलिसांना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मोहिमेअंतर्गत 10 स्पोर्ट्स बाईक 'गिक्सर 250 एसएफ' मिळाली आहेत. एएनआयचे ट्वीट-
Traffic Police have received 10 sports bike 'Gixxer 250 SF' under CSR (Corporate Social Responsibility) campaign. The bikes are equipped with a siren, blinker lights and other advance systems: DCP Traffic Ranjan Kumar Sharma, Mumbai pic.twitter.com/xUvl2qJ2Dm— ANI (@ANI) July 25, 2020
मुंबई मध्ये मागील 24 तासात 1090 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 617 जणांना आजच्या दिवसात डिस्चार्ज मिळाला असून 52 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोना रुग्ण वाढीचा दार 66 दिवसांंवर पोहचला आहे , तर आजवर एकूण 78,877 जण कोरोनमुक्त झाल्याने बरे झालेल्या रुग्णांचा दर 73 % इतका आहे. एकंदरीत कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 79 हजार 81 वर पोहचली असून सध्या 23,071 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
महाराष्ट्रात मागील 24 तासात 9,251 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तसेच दिवसभरात 257 मृत्यूंची नोंद सुद्धा झाली आहे. यानुसार राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या 3,66,368 वर पोहचली आहे, यातील 1,45,481 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर 2,07,194 जणांना आजवर डिस्चार्ज मिळाला आहे.
Maharashtra reports 9,251 new #COVID19 cases and 257 deaths today. The total number of cases in the State rises to 3,66,368 including 1,45,481 active cases and 2,07,194 discharged cases: State Health Department pic.twitter.com/UPHUGezKHA— ANI (@ANI) July 25, 2020
मध्य प्रदेश राज्यात आजच्या दिवसभरात कोरोनाचे 716 नवे कोरोना रुग्ण, 8 मृत्यू नोंदवले गेले आहेत, यानुसार राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 26,926 वर पोहचली आहे. यापैकी 7,639 ऍक्टिव्ह रुग्ण असून 799 जणांचा आजवर मृत्यू झाला आहे.
मुंबईत कोविड19 चाचणी वाढवण्याबाबत महाराष्ट्र विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. एएनआयचे ट्वीट-
Maharashtra Leader of Opposition & BJP leader, Devendra Fadnavis writes to State Chief Minister Uddhav Thackeray saying, "COVID-19 testing in Mumbai should be increased. In the absence of aggressive testing, there is a threat of a bigger spread."— ANI (@ANI) July 25, 2020
केरळमध्ये आज 1 हजार 103 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 3 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 9 हजार 420 पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट-
1,103 new #COVID19 positive cases and 3 deaths have been reported in Kerala today. There are 9420 active cases in the state now. The death toll stands at 60: Chief Minister Pinarayi Vijayan (File pic) pic.twitter.com/WKZd0uPqbv— ANI (@ANI) July 25, 2020
धारावीत आज आणखी 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांच्या संख्येने 2 हजार 529 चा आकडा गाठला आहे. एएनआयचे ट्वीट-
10 new #COVID19 positive cases reported in Dharavi area of Mumbai today, taking the total number of cases in Dharavi to 2,529 including 2,155 discharges and 124 active cases: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) #Maharashtra— ANI (@ANI) July 25, 2020
कोरोना व्हायरस संकटाचा वेढा कायम असला तरी, लॉकडाऊच्या कचाट्यातून महाराष्ट्र हळूहळू बाहेर पडू पाहतोय. महाराष्ट्र सरकारही लॉकडाऊन नियमांमध्ये काहीशी शिथिलता देऊन राज्याचे अर्थचक्र सुरु करु पाहतेय. त्याचे फायदे तोटे नजीकच्या काळात पाहायला मिळतीलच. तूर्तास तरी, येत्या 1 ऑगस्टपासून राज्यातील मॉल्स आणि व्यापारी संकुले सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. राज्यातील जनता आणि उद्योग, व्यावसायिकांसाठी हा एक मोठा दिलासाच म्हणायचा.
दरम्यान, एकूण चित्र पाहता आता राज्यातील टाळेबंदी लवकर हटवूया अशाच विचारांप्रत राज्य सरकार आल्याचे दिसते. प्रसारमाध्यमांतूनही तशाच आशयाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. असे असले तरी उद्योग, व्यवसाय आणि सार्वजनिक सेवांचे ठिक आहे. परंतू, शाळा, महाविद्यालयांचे काय? हा प्रश्न आहेच. मात्र, केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे पाहून महाराष्ट्र सरकार हा निर्णय घेईल असे दिसते. म्हणजे केंद्राच्या निर्णयापर्यंत तूर्तास तरी वाट पाहावी लागणार आहे.
दरम्यान, राज्यातील मॉल्स आणि संकुले सुरु करण्यास परवानगी मिळाली असली तरी मोठी हॉटेल्स आणि उपहारगृहांचे काय? याबाबतही उत्सुकता आहे. नाही म्हणायला निवासी व्यवस्था असलेली विश्रामगृह, हॉटेल्स (लॉजिंग आणि बोर्डिंग) सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. परंतू, हॉटेल्स खुली केल्यास होणारी संभाव्य गर्दी विचारात घेता हा निर्णय कसा घेतला जातो याबाबत उस्तुकता आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरस, लॉकडाऊन यांसोबतच स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटना, घडामोडी, त्याचे अद्ययावत तपशील आणि ठळक मुद्दे जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.