पुणेकरांना लवकरात लवकर मेट्रोची सुविधा देऊन वाहतुकीवरचा ताण कसा कमी करता येईल याकडे आमचे लक्ष आहे. कुठेही निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. कचरा प्रश्न, सोलापूर रोडची वाहतूककोंडी यांसारख्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मी, दिलीप वळसे पाटील आणि इतर सहकारी प्रयत्नशील आहोत, असे अजित पवार म्हणाले आहेत. ट्वीट-
पुणेकरांना लवकरात लवकर मेट्रोची सुविधा देऊन वाहतुकीवरचा ताण कसा कमी करता येईल याकडे आमचं लक्ष आहे. कुठेही निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. कचरा प्रश्न, सोलापूर रोडची वाहतूककोंडी यांसारख्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मी, @Dwalsepatil आणि इतर सहकारी प्रयत्नशील आहोत. pic.twitter.com/0PkTNA5wbL— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 22, 2020
महाराष्ट्र: मुंबईच्या कांदिवली पूर्व भागातील ठाकूर व्हिलेज येथे चॅलेंजर्स टॉवरच्या 24 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागली होती. ही आग विझवण्यात आली आहे. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.
Maharashtra: A fire that broke out on the 24th floor flat of Challengers Tower at Thakur Village in Mumbai's Kandivali East area has been extinguished. No injuries reported so far.— ANI (@ANI) November 22, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संसद सदस्यांसाठी बहुमजली फ्लॅटचे उद्घाटन करतील. लोकसभेचे सभापती ओम बिर्लादेखील या वेळी उपस्थित राहणार आहेत. हे फ्लॅट नवी दिल्लीतील डॉ बी डी मार्गावर आहेत, अशी माहिती समोर येत आहे. ट्वीट-
PM Narendra Modi will inaugurate multi-storeyed flats for Members of Parliament on 23rd Nov at 11 am via video conferencing. Lok Sabha speaker Om Birla will also be present on the occasion. These flats are located at Dr B D Marg in New Delhi: Prime Minister's Office pic.twitter.com/6ZIjx8dETX— ANI (@ANI) November 22, 2020
कर्नाटक मध्ये आज आणखी 1 हजार 704 जणांची नोंद झाली आहे. तर, 17 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्विट-
Karnataka reports 1,704 new #COVID19 cases, 17 fatalities. Infection tally rises to 8,73,046, death toll reaches 11,654. There are 24,868 active cases of the disease in the state.— Press Trust of India (@PTI_News) November 22, 2020
उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी रानी मौर्या यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Governor of Uttarakhand Baby Rani Maurya tests positive for COVID19 pic.twitter.com/ISJh4sQTAE— ANI (@ANI) November 22, 2020
धार्मिक स्थळ नागरिकांच्या मागणीमुळे पुन्हा सुरु केली पण त्या ठिकाणी गर्दी करु नये असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
We have opened all religious places in the state but my appeal to the public is not to crowd them: Maharashtra CM Uddhav Thackeray pic.twitter.com/rS2KbL5zhG— ANI (@ANI) November 22, 2020
राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावायचा नाही आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनापासून जेवढे लांब राहता येईल तेवढे रहा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
पोस्ट कोविडचे परिणाम भयंकर ठरतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या काळात शाळा उघडण्याची सुद्धा अद्याप भीती आहेच असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
देशात कमी झालेल्या कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं चित्र दिसून येत आहे. शनिवारी देशात 46 हजार 232 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या 90 लाख 50 हजार 597 इतकी झाली आहे. तसेच 564 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 32 हजार 726 वर पोहोचली आहे.
याशिवाय महाराष्ट्रातदेखील कोरोना रुग्णांच्या संख्येत शनिवारी मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. काल दिवसभरात राज्यात 5 हजार 760 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले. तसेच 62 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवाळीनंतर करोना रुग्णांची संख्या वाढणार असल्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली होती. त्यानुसार, दिवाळी आणि हिवाळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. नागरिकांनी योग्य खबरदारी न घेतल्यास देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, सोमवारपासून राज्यातील इयत्ता 9 वी ते 12 चे वर्ग सुरु होणार आहेत. त्यामुळे सध्या सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत 8 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच नांदेड जिल्ह्यात 22 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शिक्षकांनाचं कोरोना विषाणूची लागण झाल्याने पालक आणि शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.