असम येथे आज 142 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या 2 लाख 14 हजार 945 वर पोहचली आहे. ट्वीट-

 

शक्ती विधेयक संयुक्त निवड समितीकडे पाठविण्यात आले आहे. यात सर्व पक्षांचे 21 सदस्य असतील. लोअर हाऊसचे 14 सदस्य आणि अप्पर हाऊसचे 7 सदस्य असतील. पुढील विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी सखोल अभ्यासानंतर या विधेयकाचा अंतिम मसुदा तयार केला जाईल. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली.

मुंबई - धर्मा प्रोडक्शन्सचा माजी कार्यकारी निर्माता क्षितिज रवि प्रसाद याला ड्रगच्या प्रकरणात विशेष एनडीपीएस कोर्टाने आज जामीन मंजूर केला आहे.

दिल्ली: AIIMS च्या नर्सेस युनियनने एम्स प्रशासनाबरोबर झालेल्या बैठकीनंतर त्यांचा संप मागे घेतला आहे.

2012 मध्ये भोपाळमध्ये अल्पवयीन मुलीवर दोन पुरुषांनी केलेला बलात्कार आणि  खूनप्रकरणी सीबीआयने तपास ताब्यात घेतला आहे. या प्रकरणात मुलीच्या 16 वर्षीय मावशीची भूमिका तपासली जात आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

झारखंड मध्ये आरोग्य विभागाकडून COVID19 च्या चाचणीसाठी आता 800 रुपयांऐवजी 400 रुपये मोजावे लागणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

छत्तीसगढ मध्ये इमारतीच्या बांधकाम ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले आहेत.

मंदिराच्या संवर्धनाची योजना जाहीर करुन शिवसेनेला आपले हिंदुत्व सिद्ध करायचे आहे असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

राज्यातील पुरातन मंदिराच्या संवर्धन आणि देखभालीसाठी सरकारकडून विशेष निधी राखून ठेवला जाणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Moderna's Coronavirus Vaccine बद्दल US FDA कडून कोणतीही नवी चिंता व्यक्त करण्यात आलेली नाही.

Load More

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचा आज मुंबई हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. काल शोकप्रस्ताव आणि शक्ती विधेयक मंत्रिमंडळात चर्चेसाठी घेण्यात आल्यानंतर आज कामकाजाच्या दिवशी मराठा आरक्षण, कोरोना स्थिती तसेच शेतकर्‍यांच्या मागण्या यावरून भाजपा सरकारला लक्ष्य करण्याची शक्यता आहे.

दरम्यान आज भारताचे लोहपुरूष वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी वल्लभभाईंना सोशल मीडियामध्ये आदरांजली अर्पण केली आहे.

अमेरिकेमध्ये फायझरच्या लसीला मान्यता मिळाल्यानंतर आता लसीकरण सुरू झाले आहे. काल रात्री न्यूयॉर्कमध्ये एका नर्सला लस देण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतामध्ये फायझरला कधी मान्यता मिळणार? त्यासोबतच स्वदेशी लसीदेखील तातडीने मंजुरी मिळवण्याच्या प्रतिक्षेमध्ये आहेत. त्यामुळे आता भारतीयांचे देखील लसीच्या मंजुरीकडे लक्ष आहे. पहिल्या टप्प्यात भारतामध्ये 30 कोटी लोकांना लस देण्याचा मानस आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

शेतकरी आंदोलन सध्या भारतामध्ये वाढत आहे. यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपली प्रतिक्रिया देताना राजकीय पक्ष केवळ राजकारण करत आहेत. शेतकर्‍यांना ज्या 3 कायद्यावर आक्षेप आहे त्यावर शेतकरी नेते आणी केंद्रीय कृषी मंत्री चर्चा करून मार्ग काढतील. असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला आहे.