मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या कामाठीपुरा येथील इमारतींचा समूह पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करून, सर्वेक्षणाला सुरुवात करण्याचे गृहनिर्माण मंत्री यांचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळास आदेश दिले आहेत
रोहित पवार यांच्याविरुद्ध राम शिंदे यांनी याचिका दाखल केली होती. पवार यांच्या निवडीला थेट आव्हान दिले गेले आहे. याबाबत उच्च न्यायालयाने रोहित पवार यांना समन्स बजावून कोर्टात बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र रोहित पवार यांनी आमच्यापर्यंत समन्स पोहचले नसल्याचे सांगितले आहे.
सोलापूर-तुळजापूर मार्गावर तामलवाडी टोलनाक्याजवळ सिलेंडर वाहून नेणाऱ्या तीन ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. हा स्फोट इतका मोठा आहे की पोलिसांनी आजूबाजूचा रहिवासी भाग रिकामा केला आहे. तीन ट्रकमध्ये मिळून 580 सिलेंडर्स आहेत. यापैकी 15 सिलेंडर्सचा स्फोट झाला आहे.
नाशिक शहरात एका 60 वर्षीय बेपत्ता महिलेचा मृतदेह गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. मंदाकिनी पाटील असं या मृत महिलेचं नाव आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसला पुन्हा एकदा दिल्ली विधानसभेत मोठा धक्का बसला आहे. यंदा काँग्रेसला दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळवता आलेली नाही.
My best wishes & congratulations to Mr Kejriwal and the AAP on winning the Delhi Assembly elections.— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 11, 2020
उस्मानाबाद-सोलापूर महामार्गावर तामलवाडीजवळ गॅस टँकरने पेट घेतल्याने एकामागून एक सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. आज सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. या घटनेनंततर खबरदारीचा उपाय म्हणून तामलवाडीची काही घरे रिकामी करण्यात आली आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही. या घटनेमुळे उस्मानाबाद-सोलापूर महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे. या घटनेमुळे तामलवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पुण्याकडून लोणावळ्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या लोकल रेल्वेच्या धडकेत एका मूकबधिर महिलेचा मृत्यू झाला आहे. कान्हे येथे रेल्वे रूळ ओलांडताना ही घटना घडली. रेखा प्रकाश शेलार असे या मृत महिलेचं नाव आहे.
किर्तनाच्या विशिष्ट शैलीमुळे महाराष्ट्रात चर्चेत असलेले इंदोरीकर महाराज त्यांच्या एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांनी आपल्या एका किर्तनामध्ये लोकांना गर्भलिंगाविषयीचा ऑड-इव्हन फॉर्म्युला सांगितला आहे. सम संख्येला संभोग केल्यास मुलगा जन्माला येईल. तर विषम तारखेला संबंध आल्यास मुलगी जन्माला येईल, असं इंदोरीकरांनी आपल्या किर्तनात म्हटलं आहे. या प्रकरणी त्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून भीमा नदीत विसर्गाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सर्तकतेच्या इशारा दिला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी आणि दिल्लीकरांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Congratulations to AAP and Shri @ArvindKejriwal Ji for the victory in the Delhi Assembly Elections. Wishing them the very best in fulfilling the aspirations of the people of Delhi.— Narendra Modi (@narendramodi) February 11, 2020
आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा (Delhi Vidhansabha Elections) बहुप्रतीक्षित निकालाचा दिवस आहे, भाजप (BJP) विरुद्द आप (AAP) अशा सामन्यात आज मतमोजणीनुसार निकालाचे आकडे समोर येताच दिल्लीत कोणाची जागा कायम राहते हे समजणार आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाला बहुमत मिळताना दिसत असलं तरी भाजपला मात्र दिल्लीत आपणच सत्तेवर येऊ असं वाटत आहे.
भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी एक्झिट पोलचे सर्व अंदाज खोटे ठरतील. भाजपला 48 जागा मिळणार असल्याचा सुद्धा दावा केला आहे. तर पश्चिम दिल्लीचे भाजप खासदार परवेश वर्मा यांनीही भाजपला 50 जागा मिळतील, तर आम आदमी पार्टीला 16 आणि काँग्रेसला अवघ्या चार जागा मिळतील असे देखील भाकीत वर्तवले आहे. आज 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होताच हे अंदाज कितपत खरे ठरतात हे समोर येणार आहे.
आज राज्यसभेत अधिवेशन होणार असून, यामध्ये काही महत्वपूर्ण विधायकांवर चर्चा होणार असल्याचे समजतेय. या अधिवेशनाच्या आधी काल भाजपकडून सर्व सभागृहातील सर्व खासदारांना पत्र पाठवून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या.
दुसरीकडे महाराष्ट्रात पंढरपूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील सुपली या गावाजवळ उजनी उजव्या कालव्यावरचा धोकादायक पूल रविवारी रात्री अचानक कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी रस्त्यावरुन वळवण्यात आली आहे.सदर पुलाच्या ठिकाणी पर्यायी मार्ग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.