4G Connectivity in Ladakh: लडाखच्या दुर्गम सीमावर्ती भागात भारताची डिजीटल क्रांती; कारगिल, सियाचीन, डेमचोक आणि गलवानमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी स्थापित

4G Connectivity in Ladakh: लडाखच्या दुर्गम सीमावर्ती भागात भारताची डिजीटल क्रांती; कारगिल, सियाचीन, डेमचोक आणि गलवानमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी स्थापित
Photo Credit- X

4G Connectivity in Ladakh: लडाखच्या सीमावर्ती भागात आणि चीनच्या सीमेवरील दुर्गम गावांना 4G मोबाइल कनेक्टिव्हिटी (4G in Ladakh) स्थापित करण्यात आली आहे. भारती एअरटेलसह भारतीय लष्कराने (Indian Army) भारतातील या गावांमध्ये संपर्क सुनिश्चित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. या उपक्रमामुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल आणि दुर्गम गावांपर्यंत ऑनलाइन शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारेलहे अग्रस्थानी ठेवण्यात आले होते. याशिवाय सध्या सुरू असलेल्या डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून सरकारी योजनांद्वारे आर्थिक संधींना चालना देऊन स्थानिक समुदायाला मदत केली जाईल.

5 महिन्यांत 42 मोबाइल टॉवर बसवले

शून्याखालील असलेल्या या भागात कठोर तापमानाचा सामना करत, कारगिल, सियाचीन, डेमचोक, डीबीओ आणि गलवान या दुर्गम भागात 5 महिन्यांत 42 मोबाइल टॉवर बसवण्यात आले आहेत. यामुळे लडाखमधील सामान्य लोकांना तसेच सैनिकांना अत्यंत आवश्यक कनेक्टिव्हिटी मिळू लागली आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे राष्ट्रीय स्वप्न साध्य करण्यासाठी भारतीय लष्कर दुर्गम भागात असलेल्या गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी काम करत आहेत.

सैनिक आणि रहिवाशांमध्ये संवाद साधणे सुलभ

लडाखमध्ये मोबाईल टॉवर बसवण्यासाठी अजूनही अनेक प्रयत्न सुरू आहेत. सियाचीन ग्लेशियरवर 15,500 फूट उंचीवर मोबाईल टॉवर बसवण्यात आला आहे. यामुळे सैनिक आणि सीमेवरील रहिवाशांमध्ये संवाद साधणे सुलभ झाले आहे. एअरटेलने कारगिल, सियाचीन, गलवान, डीबीओ आणि चांगथांग सारख्या भागात 17 मोबाईल टॉवर लावले आहेत. जिओने पूर्व लडाखमधील डेमचोक भागात 13,000 फूट उंचीवर ४जी मोबाइल नेटवर्क सुरू केले आहे. BSNL आणि भारतीय लष्कराने लडाख आणि सीमा भागात 4G टॉवर बसवले आहेत. इंटरनेट कनेक्शन आणि 5G ला प्रोत्साहन देण्यासाठी लडाखमध्ये 500 मोबाईल टॉवर दिले जाणार आहेत. पेंगॉन्ग लेकजवळ 4G इंटरनेट सुविधाही पोहोचली आहे.

मार्च 2023 मध्ये मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लडाखमध्ये 5G इंटरनेट सेवेला चालना देण्यासाठी 500 मोबाईल टॉवर बसवण्यास मंजुरी दिली होती, जेणेकरून लडाखमधील संपर्क नेटवर्क प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) सर्व भागात पोहोचू शकेल. 4G आणि 5G सेवा सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधांची आव्हाने आणि लडाखमधील अनेक भागात दळणवळणाची समस्या लक्षात घेऊन सरकारने ही मान्यता दिली.

मे 2020 मध्ये गलवान येथे झालेल्या चकमकीपासून LAC वर चीनसोबतचा संघर्ष सुरू आहे. ज्यामध्ये 20 भारतीय सैनिक शहीद झाले आणि अनेक चिनी सैनिकही मारले गेले. यानंतर, LAC वर चिनी सैन्याच्या तैनातीला प्रत्युत्तर म्हणून भारताने मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले आहे. परंतु लडाखच्या विविध भागात तैनात असलेल्या स्थानिक लोकांसाठी आणि सैनिकांसाठी मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या आहे. हे पाहता केंद्र सरकार चीनच्या सीमावर्ती भागात 4G मोबाईल टॉवर बसवण्याची योजना वेगाने पुढे करत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2025 08:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).