Jaipur Suicide Case: जयपूरमध्ये कौटुंबिक वादातून पाच मुलींसह महिलेची विहिरीत उडी मारत आत्महत्या
Representational Image (Photo Credits: File Image)

जयपूरमध्ये (Jaipur) आपल्या पतीशी नियमित भांडण झाल्यामुळे नाराज, एका 40 वर्षीय महिलेने कथितपणे तिच्या पाच अल्पवयीन मुलींसह विहिरीत उडी मारली आहे. यात त्या सर्वांचा मृत्यू झाला आहे. जेव्हा हा माणूस नातेवाईकाच्या शोक सभेत सहभागी होण्यासाठी गेला होता तेव्हा ही घटना घडली, पोलिसांनी (Police) रविवारी सांगितले. त्यांनी सांगितले की, गावकऱ्यांनी रविवारी सकाळी सहा मृतदेह पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली ज्यांनी मृतदेह स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मृत महिलेचे नाव बदामदेवी आहे. तसेच ती सात मुलांची आई आहे. चेचट पोलिस स्टेशन अंतर्गत कालियाहेडी (Kaliyahedi) गावातील बंजारो का डेरा येथे राहणारे शिवलाल बंजारा यांची पत्नी आहे.

सावित्री, अंकली, काजल, गुंजन आणि एक वर्षाची अर्चना अशी पाच अल्पवयीन मुलींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, गायत्री आणि पुनम या इतर दोन मुली झोपेत असल्याने या दुर्दैवी प्रसंगातून बचावल्या. चेचट सर्कल ऑफिसर डीएसपी प्रवीण नायक म्हणाले की, महिलेने हे टोकाचे पाऊल उचलण्यामागे प्रथमदर्शनी महिला आणि तिचा पती यांच्यातील नेहमीच्या भांडणाचे कारण होते. हेही वाचा  Haryana Crime: हरियाणामध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणाने मुलीवर झाडल्या गोळ्या, आरोपी अटकेत

शिवलाल ब्लँकेट आणि कापड विक्रेते म्हणून काम करत होता. सीओने सांगितले की, रविवारी मध्यरात्री ही घटना घडली तेव्हा तो माणूस त्याच्या घरी उपस्थित नव्हता. कारण तो दुसऱ्या गावात त्याच्या नातेवाईकाच्या घरी शोक सभेला गेला होता. चेचट पोलिस स्टेशनचे एसएचओ राजेंद्र मीना यांनी सांगितले की, विहीर महिलेच्या घरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवलाल रविवारी सकाळी घरी परतला. परंतु पत्नीने हे टोकाचे पाऊल का उचलले हे त्याने पोलिसांना सांगितले नाही, असे एसएचओने सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी CrPC कलम 174 अन्वये गुन्हा दाखल केला जाईल, असे ते म्हणाले. सहा मृतदेहांचे पोस्टमॉर्टम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.