Heatwave in Delhi: दिल्ली-एनसीआरमध्ये उष्णतेची लाट कायम, उष्माघाताने 20 हून अधिक जणांचा मृत्यू; आरोग्य मंत्रालयाने दिल्या 'या' सूचना
दिल्लीच्या सरकारी राम मनोहर लोहिया रुग्णालयात 27 मे पासून उष्णतेची समस्या असलेल्या 45 रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. 27 मे पासून रूग्णालयात अशा समस्यांमुळे नऊ मृत्यू झाल्याची नोंद झाली असून यापैकी सात मृत्यू गेल्या दोन दिवसांत झाले आहेत.
Heatwave in Delhi: उत्तर भारतातील वाढत्या उष्णतेमुळे (Heatwave) दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादसह अनेक शहरांमध्ये मृतांचा आकडा वाढत आहे. बुधवारी दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयाच्या (Ram Manohar Lohia Hospital) वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले की, उष्माघातामुळे (Heatstroke)
पाचहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. आरएमएल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय शुक्ला यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांत उष्माघाताचे 22 संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी बहुतांश रुग्ण हे मजूर आहेत. त्याचवेळी नोएडामध्येही गेल्या 24 तासांत वेगवेगळ्या ठिकाणी 14 जणांचा मृत्यू झाला आहे.
उष्माघातामुळे हे सर्व मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. उत्तर भारतातील इतर अनेक शहरांमधून अशाच मृत्यूची नोंद होत आहे, त्यामागील कारण प्रखर उष्णता असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयांना उष्माघाताच्या रुग्णांवर प्राधान्याने उपचार करण्यासाठी सल्लागार जारी केला आहे. (हेही वाचा -Delhi Heatwave: दिल्लीत प्राणघातक उष्णता! गेल्या 72 तासांत उष्णतेच्या लाटेमुळे पाच जणांचा मृत्यू, उष्मा निर्देशांक 51 अंशांवर)
प्राप्त माहितीनुसार, दिल्लीच्या सरकारी राम मनोहर लोहिया रुग्णालयात 27 मे पासून उष्णतेची समस्या असलेल्या 45 रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. 27 मे पासून रूग्णालयात अशा समस्यांमुळे नऊ मृत्यू झाल्याची नोंद झाली असून यापैकी सात मृत्यू गेल्या दोन दिवसांत झाले आहेत. उष्माघातामुळे दिल्लीतील इतर रुग्णालयातही अनेकांना दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा -Rajasthan Heatwave: राजस्थानमध्ये अजूनही प्रचंड उष्णता, अनेक ठिकाणी कमाल तापमान ४५ ते ४६ अंशांपर्यंत कायम)
डॉ.अजय शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण हे मजूर म्हणून काम करणारे आहेत. अशा लोकांना उष्णता आणि सूर्यप्रकाशाचा थेट सामना करावा लागतो. रुग्णांच्या रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे मृत्यूची शक्यता वाढते. बहुतेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात कारण त्यांचे शरीर सामान्य तापमानात आणण्यासाठी खूप वेळ लागतो. मृत्यूचे प्रमाणही खूप जास्त आहे, असंही शुक्ला यांनी सांगितलं.
तथापी, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी आज उष्णतेच्या लाटेची परिस्थिती आणि केंद्र सरकारी रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेतला. बाधितांना सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा देण्यासाठी सर्व रुग्णालये सज्ज असल्याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. नड्डा यांनी केंद्र सरकारच्या रुग्णालयांमध्ये विशेष हीटवेव्ह युनिट सुरू करण्याचे निर्देशही दिले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2024 07:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

