Vistara Flights Diverted: अहमदाबाद आणि मुंबईहून दिल्लीकडे जाणाऱ्या फ्लाइट डायव्हर्ट; खराब हवामानामुळे घेण्यात आला निर्णय
केंद्र आणि दिल्ली सरकारच्या कठोरतेनंतरही हवेच्या दर्जात सुधारणा होत नाही. त्यामुळे लोकांना प्रदूषित हवेचा श्वास घ्यावा लागत आहे. दुसरीकडे, खराब हवामान आणि दिल्ली विमानतळावरील कमी दृश्यमानता यामुळे विस्तारा एअरलाइन्सची (Vistara Airlines) दोन उड्डाणे वळवण्यात (Diverted) आली आहेत.
Vistara Flights Diverted: दिल्लीतील प्रदूषणाची (Delhi Pollution) स्थिती अत्यंत वाईट आहे. अनेक भागात हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 400 ओलांडला आहे. राजधानीतील हवेचे आरोग्य ढासळत चालले आहे. केंद्र आणि दिल्ली सरकारच्या कठोरतेनंतरही हवेच्या दर्जात सुधारणा होत नाही. त्यामुळे लोकांना प्रदूषित हवेचा श्वास घ्यावा लागत आहे. दुसरीकडे, खराब हवामान आणि दिल्ली विमानतळावरील कमी दृश्यमानता यामुळे विस्तारा एअरलाइन्सची (Vistara Airlines) दोन उड्डाणे वळवण्यात (Diverted) आली आहेत.
विस्तारा एअरलाइन्सने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, अहमदाबादहून दिल्लीला जाणारे फ्लाइट UK906 खराब हवामानामुळे आणि दिल्ली विमानतळावरील कमी दृश्यमानतेमुळे परत अहमदाबादला वळवण्यात आले आहे. याशिवाय मुंबईहून दिल्लीला जाणारे UK954 हे विमान जयपूरकडे वळवण्यात आले आहे. (हेही वाचा -Delhi Pollution: प्रदूषणाचे सर्व रेकॉर्ड ब्रेक, दिल्लीचा AQI 500 पार; 'या' 20 भागात श्वास घेणं ठरतय धोकादायक)
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, 2022 च्या तुलनेत या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिल्लीमध्ये गंभीर श्रेणीतील हवेची गुणवत्ता तीन पटीने वाढली आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात एकही दिवस असा गेला नाही की, जेव्हा हवेची सामान्य श्रेणीत नोंद झाली असेल. (हेही वाचा - Supreme Court on Delhi Pollution: दिल्लीकरांच्या आरोग्याशी खेळू नका, सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले)
Flight UK906 from Ahmedabad to Delhi has been diverted to Ahmedabad and flight UK954 from Mumbai to Delhi has been diverted to Jaipur due to bad weather and low visibility at Delhi airport: Vistara pic.twitter.com/DscwR9CjmA
— ANI (@ANI) December 2, 2023
तज्ज्ञांच्या मते, प्रदूषण वाढण्यामागील कारण म्हणजे दिल्ली आणि शेजारील राज्यांमध्ये वाऱ्याचा वेग कमी होणे. याशिवाय दिवाळीनंतर उत्तरेकडील राज्यांमध्ये भुयार जाळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हवेचे प्रदूषण वाढले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 02, 2023 10:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

