डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अनुयायांना चैत्यभूमीवर येण्यास बंदी घालण्यात आली आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमी मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. ट्विट-

  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अनुयायांना चैत्यभूमीवर येण्यास बंदी घालण्यात आली आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमी मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. ट्विट-

  

तामिळनाडू येथे आज 1 हजार 868 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 18 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्विट-

 

औरंगाबाद जिल्ह्यात आज 128 जणांना सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 40368 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 96 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 42180  झाली आहे. ट्विट-

 

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी सट्टेबाजीसह ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालण्याचा अध्यादेश काढला आहे. ट्वीट-

 

जागतिक बालदिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक आणि महापालिकेच्या इमारतीला रोषणाई करण्यात आली.

WHO कडून औषधांच्या यादीमधून Remdesivir वगळण्यात आल्याचे Reuters यांनी म्हटले आहे.

मुंबई-दिल्लीसाठी रेल्वे रद्द होणार नसल्याचे मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

मुंबईत कोरोनाचे आणखी 1031 रुग्ण आढळले असून 13 जणांचा बळी गेला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 5640 रुग्ण आढळले असून 155 जणांचा बळी गेला आहे.

Load More

महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रत्येकी 2 तर शिवसेना प्रत्येकी एक जागा लढवणार आहे. 1 डिसेंबर रोजी राज्य विधानपरिषदेच्या मतदारसंघांमधील द्वैवार्षिक निवडणुकीसाठी मतदान पार पडेल.

जम्मू-काश्मीर मधील नगरोटा येथील बन टोल प्लाझाजवळ काल झालेल्या चकमकीनंतर कात्रातील वैष्णोदेवी तीर्थस्थानाजवळ सुरक्षा कडक करण्यात आली होती. यात चार दहशतवाद्यांच्या खात्मा करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहेत.

राज्यात कोरोना व्हायरसचे संकट कायम आहेच. पण त्याचबरोबर इतर अनेकही प्रश्न आहेत. वाढीव वीज बिलावरुन सध्या राजकारण रंगत आहे. वाढीव वीज बिलात सवलत दिली जाणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. वीज बिलात सवलत न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे. यानंतर मुख्यमंत्री विशेष बैठक घेऊन याबाबत पुर्नविचार करणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून कोविड-19 संकटामुळे ग्रासल्याने सर्वांचे लक्ष लसीच्या विकासाकडे लागले आहे. परंतु, लस भारतामध्ये पुढील 4 महिन्यांत तयार असेल असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे.