INDvsENG: अखिल भारतीय ज्येष्ठ निवड समितीने आता शाहबाज नदीम आणि राहुल चहर यांना मुख्य टीममधून काढून, स्टँडबाय खेळाडूंमध्ये ठवले आहे. बीसीसीआयने ही माहिती दिली.
Akshar Patel available for selection for second test match between India and England: Board of Control for Cricket in India (BCCI)— ANI (@ANI) February 11, 2021
येत्या 13 फेब्रुवारीला ठेवण्यात आलेली राज्यसभेची सभा रद्द करण्यात आली असल्याचे राज्यसभा सचिवालयाकडून सांगण्यात येत आहे.
The sitting of the Rajya Sabha fixed for 13th February has been cancelled: Rajya Sabha Secretariat pic.twitter.com/ITofU9dYYe— ANI (@ANI) February 11, 2021
मुंबईत आज दिवसभरात 624 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून मुंबईत बरे झालेल्या कोरोना रुग्णांचा दर 94% इतका झाला आहे.
#CoronavirusUpdates
११ फेब्रुवारी, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/UroMpRu8EI— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) February 11, 2021
महाराष्ट्रात मागील 24 तासांत आढळले 3,297 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 20 लाख 52 हजार 905 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 51,415 वर पोहोचला आहे.
राज्य स्वास्थ्य विभाग के अनुसार महाराष्ट्र में पिछले 24 घंटों में 3,297 नए COVID-19 मामले, 6,107 डिस्चार्ज और 25 मौतें दर्ज की गई।
कुल मामले: 20,52,905
कुल रिकवरी: 19,70,053
सक्रिय मामले: 30,265
मृत्यु: 51,415— ANI_HindiNews (@AHindinews) February 11, 2021
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मोठी घोषणा केली आहे. कोरोना व्हायरस लसिकरण संपताच नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) कायदा लागू केला जाईल, असे शाह यांनी म्हटले आहे. काही लोक सीएए कायद्याविरोधात दिशाभूल करुन गैरसमज पसरविण्याचे काम करत आहेत. परंतू, त्याचा सीएए कायद्यावर काहीही परिणाम होणार नसल्याचे शाह यांनी म्हटले. पश्चिम बंगालमील मादुआ समूदायासह सीएए अंतर्गत शरणार्थी आलेल्या भारतीयांना नागरिकाता देण्याची प्रक्रिया सीएए कायद्यांतर्गत सुरु होईल, असे शाह म्हणाले.
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी उद्या एआयसीसी मुख्यालय, दिल्ली येथे संबोधित करणार आहेत.
Congress leader Rahul Gandhi to hold a briefing tomorrow, at AICC Headquarters, Delhi.
(file pic) pic.twitter.com/eQ40AENQ3M— ANI (@ANI) February 11, 2021
जगभरातील विविध देशांमध्ये 2,072 भारतीयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकट्या सौदी अरेबियामध्ये 906 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर संयुक्त अरब अमिरातीमध्ये 375 भारतीयांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
A total of 2,072 Indians died due to coronavirus in various countries with highest death toll of 906 being reported in Saudi Arabia, followed by 375 in United Arab Emirates: Government— Press Trust of India (@PTI_News) February 11, 2021
पश्चिम बंगाल निवडणुका जिंकल्यानंतर ओडिशा, तेलंगणा आणि उर्वरित निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळणार आहे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपच्या सोशल मीडिया मेळाव्यात
Winning West Bengal polls will pave way for electoral victories in Odisha, Telangana and rest of India: Union Home Minister Amit Shah at BJP's social media meet— Press Trust of India (@PTI_News) February 11, 2021
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जानेवारीत ग्रामसभा सुरु करण्यास संमती. पण, कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने दक्षता म्हणून तात्पुरती स्थगिती. आता कोरोना नियंत्रणविषयक नियमांचे पालन करुन सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभा घेण्यास संमती असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
रेल्वे प्रवासी प्रवासादरम्यान ई केटरींगद्वारे ताजे जेवण मागवता येणार असल्याचे आयआरसीटीसीने म्हटले आहे. हे जेवणाचे शुल्क तिकीटात समाविष्ट असणार नाही. कोरोना व्हायरस संकटानंतर तयार जेवण ग्राहकांच्या मागणीप्रमाणेच देण्यात आले होते. परंतू, कालांतरानंतर लक्षात आले की, या जेवणाचे शुल्क तिकीटात समाविष्ट नव्हते असेही आयआरसीटीसीने म्हटले आहे.
The charges for the meals are not included in the ticket. After outbreak of COVID 19 only Ready to eat food is served on demand. While booking the ticket user can see that he has not paid any charges for the meal. 1/2
-IRCTC Official— Indian Railways Seva (@RailwaySeva) February 11, 2021
Passengers can order fresh meal to be delivered at their train seat through e-catering too. 2/2
-IRCTC Official— Indian Railways Seva (@RailwaySeva) February 11, 2021
एकीकडे कोरोना अटोक्यात येत असल्याचे चिन्ह दिसत आहेत. तर, दुसरीकडे महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. राज्यात लसीकरणाची तयारी सुरु असताना गेल्या 24 तासात 3 हजार 451 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.7 टक्के झाले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
1 एप्रिल 2020 पासून एकदाही वीजबिलाचा भरणा न करणारे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात तब्बल 14 लाख ग्राहक आहेत. या सर्वाचा वीजपुरवठा तोडण्याची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दूरचित्र संवादाद्वारे आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्र सरकारने बुधवारी जाहीर केले की, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय (SEBC) मधील मराठा उमेदवार ईडब्ल्यूएस आरक्षणामधून राज्य ऊर्जा विभागात नोकरीसाठी अर्ज करू शकतात. सध्या नव्याने तयार झालेल्या एसईबीसी कोट्यात मराठ्यांच्या आरक्षणाच्या वैधतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे, ज्याने नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समुदायाला आरक्षण देणार्या 2018 च्या कायद्यावर स्थगिती दिली आहे. आता ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारामुळे मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएस आरक्षणामधून अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याबाबत उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने महावितरणला कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.