Sandhya Theatre Case: संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ; नियमित जामीन याचिकेवर न्यायालय 3 जानेवारीला देणार निकाल

संध्या थिएटर प्रकरणी (Sandhya Theatre Case) अल्लू अर्जुनच्या जामीन अर्जाविरोधात पोलिसांनी काउंटर दाखल केला होता. अल्लूचे वकील वरिष्ठ वकील निरंजन रेड्डी यांनी त्याच्या जामीन अर्जावर युक्तिवाद केला. त्याचवेळी सरकारी वकिलांनी जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर नामपल्ली कोर्टाने या निर्णयाला 3 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली.

Sandhya Theatre Case: संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ; नियमित जामीन याचिकेवर न्यायालय 3 जानेवारीला देणार निकाल
Allu Arjun (फोटो सौजन्य -X/@nbramllb)

Sandhya Theatre Case: 'पुष्पा 2' चित्रपटानंतर दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी आता अभिनेत्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी अभिनेता अल्लू अर्जुनच्या नियमित जामीन अर्जावर हैदराबादच्या नामपल्ली जिल्हा न्यायालयात (Hyderabad's Nampally District Court) सुनावणी झाली. संध्या थिएटर प्रकरणी (Sandhya Theatre Case) अल्लू अर्जुनच्या जामीन अर्जाविरोधात पोलिसांनी काउंटर दाखल केला होता. अल्लूचे वकील वरिष्ठ वकील निरंजन रेड्डी यांनी त्याच्या जामीन अर्जावर युक्तिवाद केला. त्याचवेळी सरकारी वकिलांनी जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर नामपल्ली कोर्टाने या निर्णयाला 3 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली.

संध्या थिएटर प्रकरणी अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर-

संध्या थिएटर प्रकरणी अल्लू अर्जुनच्या जामीन अर्जावर आज नामपल्ली कोर्टात सुनावणी झाली. अल्लू अर्जुनला उच्च न्यायालयाने आधीच अंतरिम जामीन मंजूर केला होता, आता त्याने नियमित जामीनासाठी याचिका दाखल केली आहे. अल्लू अर्जुनच्या जामीन अर्जाविरोधात पोलिसांनी काउंटर दाखल केला आणि या प्रकरणात दोन्ही पक्षांनी आपले म्हणणे मांडले. या प्रकरणावर आता न्यायालय 3 जानेवारी 2025 रोजी निकाल देणार आहे. (हेही वाचा - Allu Arjun: अल्लू अर्जुन आणि पुष्पा चित्रपट निर्मात्यांकडून चेंगराचेंगरीतील मृत महिलेच्या कुटुंबाला 2 कोटींची मदत जाहीर)

काय आहे संध्या थिएटर प्रकरण?

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या पुष्पा 2: द फायरचे विशेष स्क्रीनिंग हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये आयोजित करण्यात आले होते. तथापि, अल्लूच्या आगमनापूर्वी थिएटरमध्ये चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली, ज्यात रेवती नावाच्या 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा 8 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्यानंतर मुलाला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. पुष्पा 2 च्या स्क्रिनिंग दरम्यान घडलेल्या घटनेनंतर, तेलुगू स्टारला अटक करण्यात आली. त्यानंतर अभिनेत्याला एक रात्र कारागृहात घालवावी लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची अंतरिम जामिनावर सुटका करण्यात आली होती. (हेही वाचा -Allu Arjun: ‘माझ्याबद्दल गैरसमज पसरविण्यात आले,अपमानित झाल्याचे वाटत आहे’; पत्रकार परिषदेत अल्लू अर्जूनचे तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि ओवैसी यांना उत्तर)

दरम्यान, 13 डिसेंबर रोजी अटक करण्यात आलेल्या अल्लू अर्जुनला तेलंगणा उच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी पुष्पा 2 अभिनेता अल्लू अर्जुन याला हैदराबाद पोलिसांनी 24 डिसेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले होते. पोलिसांनी या घटनेसंदर्भात अभिनेत्याला मंगळवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली. 3 तासांच्या चौकशीनंतर अभिनेत्याला त्याच्या घरी जाण्यास सांगण्यात आले.

(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2024 02:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).