Dhaakad Movie : धाकड चित्रपटाचे शूटींग संपले, अर्जुन रामपालने केले सेटवरील फोटो शेअर
Arjun Rampal (Photo Credits: Twitter)

अभिनेता अर्जुन रामपालने (Actor Arjun Rampal) आपल्या आगामी अ‍ॅक्शन थ्रीलर धाकड (Dhaakad) चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपवले असून त्याने सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या चित्रपटात कंगना रनौत  (Kangana Ranaut) मुख्य भूमिकेत आहे. अर्जुनने शूट पूर्ण केल्यावर त्याने आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) हँडलवरुन पडद्यामागील फोटोंची मालिका शेअर केली. अर्जुनने शूटमधून कंगना रनौत याच्यासोबत क्रॉप फोटो देखील पोस्ट केला आहे. याबद्दल त्याच्या चाहत्यांची माफी मागितली. अर्जुनला चित्रपटाचे ट्रिम खाली काढावे लागले कारण चित्रपटात त्याचा लूक अजून समोर येऊ शकत नाही. मात्र यातील काही फोटो पाहिल्यावर या चित्रपटात अर्जूनचा एक वेगळा अंदाज पहायला मिळणार असल्याचे समजते आहे.

फोटो शेअर करताना अर्जुन रामपाल म्हणाले की, चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव त्यांच्यासाठी खास होता. जेव्हा आपल्या जवळचे काहीतरी संपवतात तेव्हा अचानक शून्यतेची भावना खाली जाते. तो म्हणाला, टीम तसेच इतर सहकारी यांच्यासोबत मी घेतलेल्या आठवणी खास आहेत. सॉरी कारण कंगना रानौतचा फोटो पाहायला मिळत नाही आहे. कारण तिचा लूक दिसत नव्हता. माझ्या व्यक्तीरेखेचा फोटो अजून शेअर करू शकलो नाही. तुमच्यासोबत काम करणे आश्चर्यकारक होते. कंगना रनौतच्या भुमिकेचा लोकांवर एक वेगळ प्रभाव पडलेला यात पहायला मिळेल. असं ही त्यांने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun (@rampal72)

धाकडबद्दल सांगायचे झाले तर ही एक अ‍ॅक्शन फिल्म (action-thriller film) आहे. ज्यात कंगना एका एजंट अग्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अर्जुन रुद्रवीरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कंगना आणि अर्जुन व्यतिरिक्त दिव्या दत्तादेखील मुख्य भूमिकेत आहेत. हे रजनीश रझी घई दिग्दर्शित असून सोहेल मक्लाई यांनी निर्मित केलेले आहे. आधीचे वेळापत्रक मध्य प्रदेशात शूट करण्यात आले होते. या शुटींगसाठी पुर्ण टीम बुडापेस्टमध्ये पोहोचली होती.

याआधी जानेवारीत कंगनाने चाहत्यांना चित्रपटाविषयी माहिती दिली होती. धाकड हा जागतिक दर्जाचा स्पाय थ्रिलर चित्रपट असेल.  तसेच हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक 'टर्निंग पॉईंट' ठरेल. असा विश्वास तिने व्यक्त केला होता. कारण या चित्रपटात एका महिलेच्या नेतृत्वाखाली चित्रांचे वर्णन यात केले आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला तर भारतीय चित्रपटात महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलेलं. अशी कंगनाने प्रतिक्रिया दिली होती.