4G सेवा लवकरच आता कालबाह्य होणार आहे. 4 G ची जागा आता 5G घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच 5G  स्पेक्ट्रम लिलाव करण्याबाबतच्या दूरसंचार विभागाच्या प्रस्तावास मंजूरी दिली आहे. देशभरातील नागरिक आणि उद्योग, अस्तापनांना थेट 5जी सेवा पुरवली जाणार आहे. माहितीनुसार 20 वर्षांच्या वैध कालावधीसाठी 72097.85 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रमचा लिलाव जुलै 2022 च्या शेवटापर्यंत केला जाईल.