IND vs WI T20: रोहित शर्माचा खेळाडूंना सल्ला; आता आयपीएल सोडा, देशासाठी खेळण्यावर लक्ष केंद्रित करा
रोहितने सांगितले की, आयपीएल लिलावानंतर एक टीम मीटिंग होती, ज्यामध्ये खेळाडूंनी लिलावात काय झाले हे विसरून पुढील दोन आठवडे देशासाठी खेळण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कारण वेस्ट इंडिजपाठोपाठ आम्हाला श्रीलंकेचेही यजमानपद भूषवायचे आहे.
टीम इंडियाला (Team India) एकदिवसीय मालिकेनंतर वेस्ट इंडिजसबोत (West Indies) आता T20 मालिका (India vs West Indies T20) खेळायची आहे. ही मालिका 16 फेब्रुवारीपासून कोलकात्यात (Kolkata) सुरू होणार आहे. याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) खेळाडूंना आयपीएल 2022 मेगा लिलाव (IPL) विसरून देशासाठी खेळण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. रोहितला T20 मालिकेसंदर्भात पत्रकार परिषदेत IPL ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) बद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, भारतीय संघाचे संपूर्ण लक्ष टी-20 मालिकेवर आहे आणि खेळाडूंनाही याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. रोहितने सांगितले की, आयपीएल लिलावानंतर एक टीम मीटिंग होती, ज्यामध्ये खेळाडूंनी लिलावात काय झाले हे विसरून पुढील दोन आठवडे देशासाठी खेळण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कारण वेस्ट इंडिजपाठोपाठ आम्हाला श्रीलंकेचेही यजमानपद भूषवायचे आहे.
खेळाडूंना त्यांच्या भूमिका सांगण्यात आल्या आहेत - रोहित शर्मा
रोहित शर्मा आयपीएल लिलावाबद्दल म्हणाला, “या लिलावाशी खेळाडूंच्या भावना जोडल्या गेल्या आहेत हे समजू शकतो. आपण कोणत्या संघासोबत खेळणार असा प्रश्न त्यांना पडला असेल. पण ही आता भूतकाळाची गोष्ट झाली आहे. आम्ही टीम मिटिंग केली आणि सर्वांना सांगितले की लिलावात जे व्हायला हवे होते ते झाले आहे. त्यामुळे आता तुमची सर्व शक्ती भारतासाठी खेळण्यासाठी लावा.
'आयपीएलवर नव्हे तर टीम इंडियावर लक्ष केंद्रित करा'
टीम इंडियातील खेळाडूंना आयपीएलच्या भूमिकेनुसार योजना दिली जाईल का, असा प्रश्नही रोहित शर्माला विचारण्यात आला, ज्यावर कर्णधार म्हणाला, “प्रामाणिकपणे येथे आयपीएलचा कोणताही विचार नाही. आयपीएलमध्ये आपल्या फ्रँचायझीसाठी कोणता खेळाडू कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करेल हे आम्ही पाहत नाही, आम्ही पाहत आहोत की तो टीम इंडियासाठी कुठे आणि कशी फलंदाजी करेल? आम्ही यावर लक्ष केंद्रित करू. तसेच खेळाडू त्यांच्या फ्रेंचायझीसाठी वेगवेगळ्या भूमिका बजावतात. त्यांच्याकडून आपल्याला काय हवे आहे ते येथे महत्त्वाचे आहे. आयपीएल नंतर होईल, आम्ही त्याची काळजी घेऊ." (हे ही वाचा IND vs WI: वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे बाहेर, टी-20 मालिकेसाठी हा गोलंदाज टीम इंडियात)
रोहित म्हणाला की, खेळाडूंना त्यांच्या भूमिकांबाबत माहिती देण्यात आली आहे. आता ते परिस्थितीशी कसा जुळवून घेतात आणि गोलंदाज किंवा फलंदाज म्हणून मैदानावर आपली क्षमता कशी दाखवतात हे त्याच्यावर अवलंबून आहे.
युवा खेळाडूंवर पैशांचा पाऊस
तुम्हाला सांगतो की आयपीएल 2022 च्या लिलावात टीम इंडियाच्या युवा खेळाडूंना करोडो रुपये मिळाले होते. यष्टिरक्षक इशान किशन या मोसमातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला मुंबई इंडियन्सने 15.25 कोटींना विकत घेतले. दीपक चहरलाही चेन्नई सुपर किंग्सने 14 कोटींना विकत घेतले. याशिवाय अवेश खान 10 कोटींसह लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Feb 15, 2022 05:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

