सात्विकसाईराज रैंकीरेड्डी-चिराग शेट्टीच्या जोडीने BWF World Championship मधून घेतली माघार, हे आहे कारण
सात्विकसाईराज-चिराग शेट्टी (Photo Credit: @bwfmedia/Twitter)

भारताच्या पुरुष दुहेरीतील नवीन जोडी चिराग शेट्टी (Chirag Shetty) आणि सात्विकसाईराज रैंकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) यांनी दुखापतीमुळे आगामी बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून (BWF World Championship) माघार घेतली आहे. भारतीय जोडीने मागील रविवारी बीडब्ल्यूएफ सुपर 500 विजेतेपद मिळवत देशातील पहिले पुरुष दुहेरीची जोडी बाली. याचसह ते वर्ल्ड रँकिंगमध्ये दहावे स्थान परत मिळवले. पण, दुखापतीमुळे त्यांना आगामी प्रतिष्ठित स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 19 ऑगस्टपासून स्वित्झर्लंडच्या बसेल (Basel) शहरात आयोजित केली जाणार आहे. (Badminton World Championship: वर्ल्ड चॅम्पिअनशिपच्या सेमीफायनलमध्ये होऊ शकते सायना नेहवाल, पी व्ही सिंधू यांच्यात लढत)

थायलंड ओपन ओपनदरम्यान सात्विकच्या खांद्याला दुखापत झाली होती, परंतु आमच्या अपेक्षेप्रमाणे ते लवकर बरे झाले नाही, सेमीफायनलच्या वेळी माझेही अ‍ॅप्स दुखावले गेले होते आणि म्हणून आम्ही वर्ल्ड चॅम्पियनशिप वगळण्याचा निर्णय घेतला, चिरागने पीटीआयला सांगितले. पुढे चिराग म्हणाला की, "दोघे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या चायना ओपन आणि कोरिया ओपन खेळणार आहेत."

दरम्यान, भारताच्या महिला खेळाडू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पी व्ही सिंधू (PV Sindhu) आगामी जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भाग घेणार आहे. या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये सायना आणि सिंधू आमने-सामने असतील. जागतिक बॅडमिंटन महासंघाने केलेल्या बदलांमुळे सायना आणि सिंधूचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे.