'BCCIने कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात मला फार वाईट वागणूक दिली', युवराज सिंहचा आरोप; इतर बड्या खेळाडूंच्या नावांचाही केला उल्लेख
युवराज सिंह (Photo Credits: Getty)

बीसीसीआयने (BCCI) हरभजन सिंह, वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खान यासारख्या माजी सहकाऱ्यांच्या कारकीर्दीचा शेवटपर्यंत चांगला व्यवस्थापन केलं नाही असा आरोप भारताचा माजी 'सिक्सर किंग' युवराज सिंहने (Yuvraj Singh) केला आणि भविष्यात सामना जिंकणाऱ्या प्रयत्नांना बोर्ड मान्यता देईल आणि भारतीय क्रिकेटमधील (Indian Cricket) योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करेल अशी आशा व्यक्त केली. 19 वर्षे खेळल्यानंतर गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या युवराजला झहीर किंवा सेहवागप्रमाणे निरोप सामना मिळाला नाही. बीसीसीआयने त्याला कारकिर्दीच्या शेवटपर्यंत ज्या प्रकारे त्याला हाताळले ते ‘अव्यावसायिक’ होते, परंतु हे आश्चर्यकारक नव्हते असेही युवराजला वाटते. “एखाद्याला निरोप सामना देणे, हे माझ्यासाठी निर्णय घेण्यासारखे नाही. हे बीसीसीआयवर अवलंबून आहे. माझ्या कारकीर्दीच्या शेवटी त्यांनी मला ज्या पद्धतीने व्यवस्थापित केले ते खूपच अव्यावसायिक होते,” युवराजने Sportskeedaला सांगितले. ('तुला म्हणायचंय भारताकडे सामना जिंकावणारे अष्टपैलू खेळाडू नाहीत?', इरफान पठाण-युवराज सिंह ट्विटरवर एकमेकांना भिडले, पाहा Tweet)

“परंतु भारताकडून काही महान खेळाडूंकडे पाहिले तर - हरभजन [सिंग], [वीरेंद्र] सेहवाग, झहीर खान - यांचेही वाईट व्यवस्थापन केले गेले. हा भारतीय क्रिकेटचा एक भाग आहे, मी भूतकाळात पाहिले आहे त्यामुळे मला आश्चर्य वाटले नव्हते.” युवराज अखेर 2017 मध्ये वेस्ट इंडीज दौर्‍यादरम्यान भारताकडून खेळला होता. त्या वर्षाच्या सुरुवातीला युवराजने इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत भारतीय संघात अंतिम पुनरागमन केले आणि कटकमध्ये करिअरच्या सर्वोत्तम 150 धावा फटकावल्या. युवराज 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य होता जिथे पाकिस्तानविरुद्ध 53 धावांची महत्त्वपूर्ण योगदान दिले.

गेल्या वर्षी विश्वचषक स्पर्धेच्या मध्यात निवृत्तीची घोषणा करणाऱ्या युवराजची इच्छा आहे की बीसीसीआय खेळाच्या काही महान खेळाडूंचा आदर करेल. “भविष्यात जो कोणी बर्‍याच काळापासून भारताकडून खेळला आहे आणि कठीण परिस्थितीत आहे, तुम्ही नक्कीच त्याचा सन्मान केला पाहिजे. त्याला आदर द्या, गौतम गंभीर सारख्या ज्याने आमच्यासाठी दोन विश्वचषक जिंकले आहेत. कसोटीत सुनील गावस्करनंतर सर्वात मोठा सामना जिंकवणारा सेहवाग. झहीर, ज्याने 350 विकेट्स घेतले आहेत, लक्ष्मण... आणि हे सर्व लोक,” युवराज म्हणाला.