Ranji Trophy 2019-20: बिहारच्या अभिजित साकेत याने केला चेंडूने कहर, मिझोरमविरुद्ध सामन्यात एकही धाव न देता घेतल्या 7 विकेट
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

बिहार (Bihar) क्रिकेट संघाचा मध्यम वेगवान गोलंदाज अभिजित साकेत (Abhijeet Saket) याने आपल्या पहिल्या श्रेणी कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करताना मिझोरम (Mizoram) विरुद्ध संघाला शानदार विजय मिळवून दिला. या सामन्यात बिहारने मिझोरमला रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) सामन्यात सहा गडी राखून पराभूत केले. आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी साकेतने 12 धावा देऊन 7 बळी घेतले. मिझोरमविरुद्ध बिहार संघाने प्रभावी क्रिकेट खेळला आणि बिहारने तीन दिवसांत सामना जिंकला. पहिल्या डावात 378 धावा करणारा मिझोरमचा संघ दुसर्‍या डावात 68 धावांवर ऑल आऊट झाला. अशाप्रकारे विजयासाठी बिहारला 185 धावांचे लक्ष्य मिळाले. सलामी फलंदाज इंद्रजित कुमार याच्या नाबाद 98 आणि बाबुल कुमार याच्या 61 धावांच्या मदतीने बिहारने चार विकेट गमावून लक्ष्य गाठले. या सामन्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मिझोरमचा सलामी फलंदाज प्रितीक देसाई आणि बिहारचा वेगवान गोलंदाज अभिजीत ठरले. पहिल्या डावात प्रितीकने 210 चेंडूत 192 धावांची शानदार खेळी खेळून संघाला मजबूत स्थितीत आणले, मात्र दुसऱ्या डावात तो आपला प्रभाव सोडू शकला नाही आणि शून्यावर बाद झाला. साकेतने त्याला आपला शिकार बनवला.

या सामन्यात मिझोरमविरुद्ध पहिल्या एक डावात विकेट घेणाऱ्या साकेतने दुसऱ्या डावात पूर्ण वर्चस्व राखले आणि त्याने सात गडी बाद केले. साकेतने घातक गोलंदाजी केली आणि सातपैकी पाच फलंदाजांना शून्यावर बाद केले. अन्य दोन फलंदाजांनी एक आणि तीन धावा केल्या. त्याने 10 षटकांत 12 धावा देऊन विकेट घेतल्या आणि सहा मदन ओव्हरही टाकल्या. साकेतने घेतलेल्या सात विकेट्स दरम्यान त्याने एकही धाव दिली नाही. यानंतर त्याने 12 धावा लुटलेल्या. शिवाय,बिहारकडून दुसर्‍या डावात अमनला दोन तर शिवमला गडी बाद करता आला.

दुसरीकडे, मंगळदोई येथे कमी धावांच्या सामन्यात पुडुचेरीने मेघालयला पाच गडी राखून पराभूत केले. मेघालयने 65 आणि 63 धावा केल्या तर पुडुचेरीने पहिल्या डावात 80 धावा केल्या. पुद्दुचेरीला 49 धावांचे लक्ष्य मिळाले आणि त्याने पाच विकेट गमावून गाठले. या गटातील दुसर्‍या सामन्यात गोव्याने मणिपूरविरुद्ध डाव आणि 359 धावांनी मोठा विजय नोंदविला. पहिल्या डावात 106 धावा करणारा मणिपूरचा संघ दुसर्‍या डावात 88 धावांवर ऑल आऊट झाला. पाच बाद 553 धावा करुन गोव्याने पहिला डाव घोषित केला. चंदीगडने घरच्या मैदानावर नागालँडविरूद्ध पहिला विकेट सहा विकेट्ससाठी 400 धावांवर घोषित केला. मनन वोहरा याने 121 आणि रमण बिश्नोई यांने 100 धावांची खेळी केली.